शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

By admin | Published: September 19, 2016 12:48 AM

यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे.

पीक विम्यापोटी भरला६८५ कोटींचा हप्ताचंद्रपूर : यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे. त्यामध्ये शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये वाटा दिला असून शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपये विमा हप्ता भरला आहे. जिल्ह्यामध्ये धान, कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने प्रामुख्याने या पिकांचा विमा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी पत पुरवठ्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेत धान पिकाला ७० टक्के जोखीम स्तर धरण्यात येऊन हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस कंपनीला उंबरठा पातळीपर्यंत हेक्टरी २ हजार ६२८ रुपये विमा हप्ता द्यायचा होता. शेतकऱ्यांना ७८० रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला. तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या वाट्याचे प्रत्येकी ९२४ रुपये शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीला दिले आहेत. सोयाबीनमध्येदेखील ७० टक्के जोमीख स्तर ठेवण्यात आला आहे. तर ३६ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम आहे. उंबरठा पातळीपर्यंत विमा हप्ता २ हजार ८८० रुपये आहे. त्यात शेतकऱ्यांकडून ७२० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी १०८० रुपये आपापला वाटा दिला आहे. कापूस पिकासाठीही ३६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. विमा हप्त्याची उंबरठा पातळीपर्यंत रक्कम २३४० रुपये आहे.शेतकऱ्यांना कापूस विमा हप्ता म्हणून १८०० रुपये भरावे लागले. तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी २७० रुपयांचा आपापला वाटा भरला. तूर पिकाला २८ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठरविण्यात आली आहे. उंबरठा पातळीपर्यंत ४ हजार ७०४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५६० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने २ हजार ७२ रुपये भरले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ९० हजारकर्जदार शेतकरीराज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही कर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे ९९ टक्के संख्या आहे. पीक विमा काढणाऱ्या एकूण ९१ हजार २२५ शेतकऱ्यांपैकी सुमारे ९० हजार २८८ शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्यांची खाती जिल्हा बँकेसह कोणत्या ना कोणत्या बॅकेत आहे. त्यामुळे विमा काढणारया या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी ७८ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. तर कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ ८१५ हेक्टर क्षेत्रातील पीक विमा काढला आहे.सर्वच तालुक्यातधानाला विमा संरक्षणजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये धान पिकाला संरक्षण दिले आहेत. तर सोयाबीन पीक सिंदेवाही तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे. तूर पीक ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यात अधिसूचित करण्यात आलेले नाही. उर्वरित तालुक्यांमध्ये तुरीचा पीक विमा काढण्यात आला आहे. कापूस चंद्रपूर, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात अधिसूचित करण्यात आला आहे. मूग व उडिद केवळ ब्रह्मपुरी तालुक्यात अधिसूचित करण्यात आले.केंद्र-राज्य वाटा समानया योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा समान आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी १५ कोटी ६३ लाख २७ हजार १३० रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ९ लाख २२ हजार ८२९ रुपये भरले आहेत. त्याच वेळी केंद्र व राज्य शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये भरले आहेत. कर्जदारांचे ६६५ कोटी ८६ लाख ८७ हजार ५९ रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ४ कोटी १२ लाख ८१२ रुपये भरले आहेत.