शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'पैनगंगा' नदीवरील पूल तयार होऊन दीड वर्ष लोटले; पण लोकार्पण केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:16 IST

प्रशासनाने लक्ष द्यावे: २१ किमीचे अंतर होणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना तालुक्यातील पारडी ते झरी व खातेरादरम्यानच्या नदी घाटावर पुलाची निर्मिती झाली. याला दीड वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला. मात्र, या पुलाचे उ‌द्घाटन, पुलाच्या साइडिंगचे डांबरीकरण, खातेरा गावातील वळण रस्ता आदी कामे प्रलंबितच आहे. त्यामुळे ही कामे कधी होणार, असा सवाल दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषा असलेल्या, पैनगंगा नदीवरील हा चौथा मोठा पूल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी व वणी या दोन तालुक्यांची, चंद्रपूर जिल्ह्यातील एकट्या कोरपना तालुक्याची सीमा या नदीला लागली आहे. कोडशी खु, वनोजा, विरूर पुलानंतर या पुलाच्या निर्मितीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कोरपना ते मुकुटबन या दोन्ही शहरांना जाण्या-येण्याचा कमी अंतरात प्रवास सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोडशी खु., वनोजा पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, विरूर पुलाची निर्मिती डब्लूसीएल, तर या नवनिर्मित पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाच्या माध्यमातून झाली आहे; परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे लोकार्पण होणे अपेक्षित असताना ते आजतागायत झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. 

पुन्हा किमान दोन पुलांची गरज कोरपना तालुक्यातील गांधीनगर-तेजापूर, भारोसा-जुगाद या दोन पैनगंगा नदीघाटावर पुलाची नितांत आवश्यकता आहे. या मार्गावर पुलाची निर्मिती झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा रहदारीसाठी कमी अंतरात जाणे येणे सोपे होईल.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर