शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

अबब ! ऐेंशी वर्षीय वृद्ध चालवतो सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:32 AM

कोरपना : दिवसेंदिवस सभोवतालचे दूषित होणारे वातावरण व रासायनिक पदार्थांच्या अतिवापराने माणसाचे वयोमान कमी झाले आहे. त्यातही आजच्या धकाधकीच्या ...

कोरपना : दिवसेंदिवस सभोवतालचे दूषित होणारे वातावरण व रासायनिक पदार्थांच्या अतिवापराने माणसाचे वयोमान कमी झाले आहे. त्यातही आजच्या धकाधकीच्या युगात मानवाला उतारवयात विविध व्याधींनी ग्रासले आहे. मात्र, तो ऐंशी वर्षांचा वृद्ध तरुणाला लाजवेल, अशाप्रकारे रस्त्यावर सायकल चालवून निरोगी आयुष्याचा व पर्यावरण रक्षणाचा खरा मूलमंत्र देत आहे.

तात्याजी माधवराव उलमाले हे कोरपना तालुक्यातील वनसडी गावचे रहिवासी. ते प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आहेत. १९४९ पासून त्यांनी सायकल चालविण्यास सुरुवात केली, ती आजतागायत अविरतपणे सुरू आहे. लहान वयात माता रोगाची लागण झाल्यानंतर त्यांना आजतागायत कुठल्याही आजाराने पछाडले नाही. नियमित व्यायाम म्हणून सायकल चालवणे हेच त्यांच्या निरोगी आयुष्याचे रहस्य असल्याचे मत त्यांनी लोकमतला सांगितले.

या आधुनिक काळात नागरिक थोड्या-थोडक्या कामासाठी मोटारसायकलीचा वापर करतात. त्यातही पेट्रोल, डिझेलचे भाव कडाडलेले आहेत. तात्याजी उलमाले यांची दैनंदिनी या उतारवयातही सायकलने सुरू होते. सायकलच्या वापरामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते, असे ते सांगतात. शरीराला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, चरबी कमी होणे, पचनक्रिया सुधारणे यांसारखे सकारात्मक परिणाम होत असून, सायकलचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

उलमाले हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून, शेतीवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. त्यांना चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. १९६३ मध्ये त्यांनी सर्वप्रथम शिक्षक म्हणून तीस रुपये वेतनावर नोकरी केली. एक वर्ष निमणी गावचे पोलीस पाटील म्हणून धुरा वाहिली. त्यानंतर एक वर्ष अंतरगाव येथे पोस्ट मास्तर म्हणूनही काम केले. यानंतर मात्र शेती या पारंपरिक व्यवसायात ते रमले. नियमित सायकलच्या वापरामुळे पर्यावरणपूरक आयुष्य जगता येत असून, आपल्या सुदृढ आरोग्याचा हाच मूलमंत्र असल्याचे ते सांगतात. तरुणांनाही लाजवेल, असे निरोगी आयुष्य ते जगत आहेत, हे विशेष.