शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 12:53 AM

सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत.

वन्यप्राणी हल्ले वाढले : गावागावांत दवंडी व गस्तीत वाढमूल : सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यावर उपाय म्हणून वनविभागाने आता जंगलात प्रवेशबंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावागावांत दवंडी पिटली जात असून गस्तीतही वाढ करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालविला आहे. चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व उपवनसंरक्षक संरक्षक आर.टी. धाबेकर यांच्या आदेशानुसार मूल तालुक्यातील राजोली क्षेत्रात प्रेशबंदीचा प्रयत्न करुन मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेले वन दिवसेंदिवस कमी होत असल्याने तसेच जंगलातील वन्यप्राणी जे हिंस्र प्राण्यांना अन्न म्हणून हवे असते, ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात हिंस्र प्राणी वाघ, बिबट हे गावाशेजारी आश्रय घेत असल्याचे दिसून येत आहे. गावाशेजारी असलेल्या जंगलात सरपणासाठी असो की इतर कामासाठी महिला किंवा पुरुष गेला की दबा धरुन बसलेले हे वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला चढवितात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती अशाप्रकारे मृत्यू पावल्याने कुटुंबांवरही आभाळ कोसळते. हे टाळण्यासाठी वनविभागाने राखीव वनाशेजारी असलेल्या गावागावात प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना प्रवेशबंदीचे पत्र राजोली परिक्षेत्रात देण्यात आले आहे. तसेच या अधिनस्त असलेल्या वनरक्षक व वनमजुरामार्फतीने गावात दवंडी देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. जंगलात गस्तसुद्धा वाढविण्यात आली आहे. जंगलात ट्रॅप कॅमेरेसुद्धा वाढविण्यात आले असून जंगलात होणाऱ्या एकूण हालचालीवर करडी नजर वनविभागाने ठेवली आहे. वनविभागाने सर्व गावात हा उपक्रम राबविल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळता येऊन अनुचित घटनांवर आळा बसेल. (तालुका प्रतिनिधी)