शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

निरस्त प्रकरणातील आरोपींना परत नव्याने समन्स

By admin | Published: September 25, 2015 1:39 AM

प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

नागभीड : प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाच्या या धोरणाबद्दल संतापही व्यक्त होत आहे.२००९ देशात लोकसभेची निवडणूक झाली. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात त्यावेळी भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून मारोतराव कोवासे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आचारसंहितेचे भंग केल्याच्या आरोपावरुन त्यावेळी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय गजपुरे, जहाँगीर कुरेशी, रवींद्र आंबोरकर, वामण तलमले यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.काही दिवस हे प्रकरण कोर्टात चालल्यानंतर यथावकाश या प्रकरणाचा निकाल लागला. या सर्वांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. दरम्यान २०१५ मध्ये या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि अचानकपणे २००९ च्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सर्व लोकांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले.हे समन्स हाती पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकरण निरस्त झाल्यानंतर समन्स कसे काय, यासंदर्भात त्यांनी माहिती काढली असता गेल्या १० वर्षात ज्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांनाच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशान्वये समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली. (तालुका प्रतिनिधी)