शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 18:41 IST

१५ महिला स्थानबद्ध : मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : शहरातील सुमित्रा नगर परिसरातील नागरिकांना मनपाच्या अमृत नळयोजनेचे पाणीच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता खत्री महाविद्यालयासमोर ताडोबाचा मार्ग दोन तास रोखून धरला. या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी १५ महिलांना स्थानबद्ध करून काही वेळाने सोडून दिले.

महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेंतर्गत तीन वर्षांपासून पाणीपुरवठा जोडणी सुरू आहे. पण, सुमित्रा नगर परिसरात जोडणी झाली नाही. या भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी, या मागणीसाठी प्रभागातील महिला एकत्र आल्या. त्यांनी खत्री महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून ताडोबा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. पण, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दोन तासांनंतर ताडोबा मार्ग पूर्ववत सुरू झाला. सुमित्रा नगर परिसरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी नगरसेवक सुभाष कासनगोदूवार, मंजुश्री कासनगोदूवार, प्रज्ञा गंधेवार, वसंत धंदरे, विजय चिताडे, माया ऊईके, आशिष ताजने, रंजीत मातंगी, आशिष बोंडे, अभिषेक सिंग, ललिता बावनथडे, दीपा नागरीकर आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर