शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

निराधाराच्या पैशानेच बालाजीचा घात

By admin | Published: May 16, 2017 12:35 AM

राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही.

पैसे मिळालेच नाही : कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे यांनी संपविली जीवनयात्रा संघरक्षित तावाडे। लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही. उलट त्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी खिल्ली उडविली जात आहे. शेतकरी आत्महत्येला जसे कर्ज कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय यंत्रणाही कारणीभूत ठरत असल्याचे बालाजी गुटे या शेतकऱ्यांवर घडलेल्या प्रसंगावरून दिसून येते. दोन दिवसापूर्वी म्हणजे १३ मे रोजी जिवती तालुक्यातील पुडियाल मोहदा येथील कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे (६९) यांनी आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुष्काळ आणि सततच्या नापिकीने जीवन कसे जगावे, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या बालाजी गुंटे या वृध्द शेतकऱ्याने एकदाचे जीवनच संपविले.आत्महत्यापूर्वी ते काही दिवसांपासून आपल्या निराधाराच्या पैशासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ये-जा करीत होते. महिन्याकाठी ६०० रुपये याप्रमाणे बालाजी गुटे यांना निराधाराचे पैसे मिळायचे. ६०० रुपये म्हणजे निराधाराला जगण्यासाठी आधारच असतो. पण यावेळेला मात्र बँकेत आपल्या निराधाराच्या पैशासाठी येरझाऱ्या मारता- मारता बालाजी थकून गेले होते, असे गावकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर समजले. कदाचित अगोदरच कर्जाने थकलेल्या त्या गरीब शेतकऱ्याचे नियोजनच बिघडले असावे आणि निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज जनतेकडून आणि घरच्यांकडून वर्तविला जात आहे. लोकमतने वेधले होते लक्ष१३ मे रोजी लोकमतने बँकेतील निराधारांची गर्दी पाहता आणि दिवसभर बँकेत बसूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने निराधारांना आधारच नाही, या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचदिवशी बालाजी गुंटे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. वैनगंगा- कोकण ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोन बँका असून येथेही पुरेशी रक्कम राहत नाही. याबाबतही लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून यंत्रणेचे लक्ष वेधले. प्रशासन मात्र दुर्लक्षच करीत आहे. असेच जर नेहमी राहले तर आणखी अनुचित घटना घडण्यास कोणीच रोखू शकणार नाही,निराधारांना वेळीच पैसे द्यावे -महेश देवकतेपुडियाला मोहदा येथील बाजाली गुंटे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. तसेच निराधाराच्या पैशासाठी गुंटे यांनी भरलेला बँकेचा विड्राल (दि. १२ मे रोजी), निराधाराचे न मिळालेले पैसे हा सर्व प्रकार सांत्वनासाठी गेलेल्या पं.स. उपसभापती महेश देवकते यांच्या निदर्शनात आणून दिला. यापुढे बँकांनी शेतकरी असोत की निराधार व्यक्ती असो, यांना वेळीचे पैसे द्यावे, बँकेत गरीब निराधारांची गर्दी दिसणार नाही. बँकेत नेहमी रक्कम असायलाच हवी. जेणेकरुन सर्वांना पैसे मिळायला हवे, अशी मागणी देवकते यांनी संबंधित यंत्रणेकडे केली. ग्रामीण बँकेत निराधार लोकांकडे नेहमी दुर्लक्ष दिसत असून यानंतर हा प्रकार सहन केला जाणर नाही, असेही त्यांनी सांगितले.