शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बल्लारपुरात आहेत नानाविध सेल्फीस्थळे, युवावर्ग आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:18 IST

स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । ऐतिहासिक, नैसर्गिक, औद्योगिक, धार्मिकस्थळांना पसंती

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात. बरेच शहर, गाव, खेड्यामध्ये अशी स्थळं आहेत. वर्धा नदी काठावरील बल्लारपूर या ऐतिहासिक शहरात सेल्फीकरिता नाना प्रकारची विविध स्थळ आहेत. जी सेल्फी प्रेमींना आवडतील, आवडत आहेत. वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपासून उभा असलेल्या किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी नदीच्या ऐन तिरावरील राणी महालातील आतील पंचकोनी भाग, नदीकडे उतरण्याकरिता असेलले प्रवेशद्वार आकर्षित करीत आहेत.किल्याला लागूनच वर्धा नदीचे गणपती घाट प्रसन्नता देणारे सेल्फी स्थळ आहे. बारमाही वाहणारी वर्धा माय सेल्फीत आणता येते. वनश्रीची श्रीमंती वा वैभव असे ज्याला म्हणतात, ते खूप मोठ्या लांबीचे व तेवढेच रूंद सागवानाचे लाकूड येथील काष्ट भांडारात दर्शनार्थ ठेवले आहे. त्या लाकडावर त्या त्या वर्षाच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. या भव्य लाकडासोबत सेल्फी न काढले तर नवल. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसर तर सेल्फीप्रेमींचे अत्यंत आवडीचे ठिकाण झाले आहे. फलाटांवर विविध प्राण्यांचे जिवंत वाटावे असे पुतळे, भिंतीवर नानाप्रकारची वेधक चित्र मन आकर्षून घेतात आणि ते सारे सेल्फीकरिता खुणावतात. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कोणतीही गाडी दहा-पंधरा मिनिटे थांबतेच. येथील नव्याने बांधलेले बसस्थानक हे तर साऱ्यांचे आवडीचे सेल्फी स्थळ झाले आहे.सेल्फी काढताना मात्र काळजी घेणे आवश्यकश्री बालाजी मंदिर हे श्रद्धास्थानही त्यापुढे उभे राहून सेल्फी काढावे असे प्रेक्षणीय आहे. येथील बसस्थानकाच्या सडकेला लागून असलेल्या मोकळया उंच भागावर पेपरमिलच्या दिशेने उभे राहून सेल्फी काढली की पेपर मिलची अवाढव्यता आपल्या मागे फोटोत ठळकपणे दिसते. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील पावर हाऊस जवळील स्लज टेकडी व घाटरोड सदृश्य भाग सेल्फीचे उत्तम ठिकाण आहे. वर्धा नदीवरील सास्ती तसेच राजुरा पूल हीसुद्धा सेल्फी स्थळ आहेत. बल्लारपूर शहरात सेल्फी स्थळांची कमतरता नाही. सेल्फी काढताना आवश्यक ती काळजी घेणे, तेवढे गरजेचे आहे. अन्यथा एखादा अपघात घडण्याची दुर्दैवी वेळ येण्याची शक्यात असते.

टॅग्स :Selfieसेल्फी