शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:49 PM

या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाने लक्ष द्यावे : पुलावर खड्डे व सळाखी बाहेर निघाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. मात्र मागील काही वर्षात या पुलाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची अवस्था दयनीय होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.वर्धा नदी बेलोरा घाटावरील पूल तयार होऊन १९८७ मध्ये रहदारी सुरू झाली. टोल वसुली झाली. त्यानंतर वर्धा नदीच्या काठावर दोन्ही बाजुने वेकोलिने ओ. बी. (माती) टाकली. त्यामुळे सदर पुलाच्या बेलोरा साईडची माती पुराच्या पाण्याने वाहून गेली. पुलाला धोका निर्माण झाल्याने १९९९ मध्ये पुलाचे वाढीव काम करण्यात आले. त्यावेळीसुद्धा वाहनधारकाकडून टोल वसुली करण्यात आली होती. सदर पुलावरून मोठया प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी बहार निघाल्या. पुलाची दूरवस्था झाली. वेकोलिच्या कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी वेकोलि व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. आणि उशिरा का होईना, मागील वर्षी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने एक कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले. मात्र एका वर्षात या कामाला तडे जाऊ लागले. या पुलाच्या बाजूने दुचाकी व सायकलीच्या रहदारीकरीता व्यवस्था आहे. पुलावर सिमेंट कॉकेटचे पिल्लर टाकून ही व्यवस्था केली आहे. पण त्या रस्त्याच्या साफसफाईकडे संबंधिताचे दुर्लक्ष झाल्याने धुळ जमा होऊन पावसाने चिखल झाले आहे. सिमेंट कॉकेटचे पिल्लर अनेक ठिकाणी तुटून पडले असल्यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे. जडवाहनांच्या रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करावा लागतो.वर्धा नदी धानोरा पुलावरून आंध्र, गडचांदूर कडून वणी, यवतमाळ, मुबंईकडे रात्रंदिवस जडवाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुर्दशा झाली. त्याच बरोबर सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी निघाल्यामुळे पुलाची दूरवस्था झाली. पुलाला कठडे नसल्याने व पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पुलाच्या गंभीर समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल हसन यांनी पुलावरील मोठमोठ्या खड्डयाचे फोटो काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना पाठविले आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. यावर संबंधित अधिकाºयांनी पुलाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.हिच परिस्थिती वर्धा नदी मुंगोली पुलाची झाली आहे. सदर पुलावरून घुग्घुस मार्गे मुंगोली, सिंदोला, अदिलाबाद, वणीकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असते. तसेच मुंगोली, कोलगाव कोळसा खाणीतून घुग्घुस रेल्वे सायडींग व चंद्रपूर, नागपूरकडे कोळसाची सुमारे २००४ पासून वाहतूक सुरू आहे. पुलाला कठडे नसल्याने अनेकदा ट्रक नदीत पडले. वारंवार कठडे लावण्याची मागणी झाल्यानंतर थातूरमातूर तारा बांधल्या आहे. पण पुलावर जागोजागी खड्डे पडले व सळाखी निघाल्याने पुलावरून वाहन नेताना चालकाला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.