शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
2
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
3
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
4
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
5
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
6
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
7
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
8
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
10
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
11
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
12
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
13
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
14
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
15
इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याची मागणी
16
आणखी एका बँक अधिकाऱ्याची अटल सेतूवरून उडी; पत्नीला शेवटचा मेसेज...
17
बचतीवर व्याज जैसे थे, सर्वसामान्यांना दिलासा
18
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
20
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

शेतामध्ये आग लावणाऱ्यांवर आळा घाला

By admin | Published: May 14, 2017 12:36 AM

शेतामध्ये बेजबाबदारपणे आग लावण्यात येते. अशा आगी लावणाऱ्यांवर आळा बसावा, ...

पर्यावरणप्रेमींची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतामध्ये बेजबाबदारपणे आग लावण्यात येते. अशा आगी लावणाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी पर्यावरण समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, पर्यावरण प्रेमी राकेश राऊत, अतम मेश्राम, नितेश दोडके, मनी राय यांच्या नेतृत्वात चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.उन्हाळी हंगाम संपत आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सर्वप्रथम शेतातील काटे, अनावश्यक झुडुपे व इतर इजा पोहोचविणारे वृक्ष जाळण्यासाठी आगीचे वनवे लावतात. त्या आगीमुळे शेतातील झाडांचा राखरांगोळी होत आहेत. आगीमुळे सुमारे १००० ते २००० च्या आसपास झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे. अशा प्रकारचे विदारक चित्र चिमूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.दिवस संपत आला की रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतामध्ये वनवा लावून घराकडे निघून जातात. त्यामुळे शेतातील झाडे जळून खाक होण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्याचबरोबर त्या झाडावर असणारे पशुपक्षी यांचा निवारा हरपला असून त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात वनवा लावल्यानंतर तो वनवा शेतामधून इतरत्र जंगलाकडे वळतो आणि त्यामुळे जंगलाला आग लागून जंगलाची राख रांगोळी होण्याच्या घटना घडत असतात.या वनव्यामुळे पशुपक्षी, वन्यजीव व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना धोका पोहोचत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. बेजबाबदारपणे वनवे लावणाऱ्यावर आळा बसावा, यासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे चिमूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून अनावश्यक झुडपे जाळल्यास वनवा इतरत्र पसरणार नाही आणि जंगल पेटणार नाही, असे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे.