शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोजर

By admin | Published: March 19, 2016 12:39 AM

वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत पोवनी २ व ३ या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी व वरोडा ...

वेकोलिचा प्रताप : अधिग्रहित जमिनीचा मोबदला मिळण्याआधीच खाणीचे काम सुरूनितीन मुसळेसास्ती वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत पोवनी २ व ३ या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी व वरोडा शेतशिवारातील शेतजमिनीचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना मोबदला व नोकरी देण्याचे मान्य केले. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला व नोकऱ्या मिळाल्या नाहीत. असे असताना वेकोलिने संबंधित शेतजमिनीवर कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून त्वरीत मोबदला व नोकरी द्या अन्यथा काम बंद करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास वेकोलिच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी असून वेकोलिचा विस्तार करणे सुरू आहे. वेकोलिने नव्यानेच पोवनी २ व ३ या कोळसा खाणीसाठी साखरी-पोवनी शेतशिवारातील जवळपास २३६ शेतकऱ्यांच्या ३०५ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण केले, तर साखरी-वरोडा परिसरातील १८५ शेतकऱ्यांच्या ७७८ हेक्टर शेतजमीन अधिग्रजहत केली आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला व नोकरी देण्याचे कबूल करून २० आॅक्टोबर २०१५ रोजी मोठा वाजागाजा करून धनादेश वाटपाचा मोठा कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात ४० कोटींच्या धनादेशाचे वाटपही केले. परंतु अनेक शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही तर प्रकल्पबाधित २३६ शेतकऱ्यांपैकी केवळ १३० प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीचे आदेश देण्यात आले. उर्वरित शेतकरी अजूनही नोकरीच्या व मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अधिग्रहीत जमिनीवर सेक्शन ९ लागले असून सेक्शन ११ करिता कार्यालयीन कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येते. परंतु वेकोलिने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला व नोकऱ्या देण्यापूर्वीच कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून वेकोलिविरोधात रोष व्यक्त करीत असून शेतकऱ्यांनी त्वरीत मोबदला देण्याची व नोकऱ्या देण्याची मागणी केली असून तसे निवेदन वेकोलि प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दिली आहे.वेकोलिने या अधिग्रहित जमिनीवर असलेल्या पिकांवर ट्रॅक्टर, बुलडोजर चालवून जमीन साफ करणे व इतर कामे सुरू केली आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे काम थांबविण्याची मागणी केली आहे. सोबतच ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय आहे, त्यांना एकरी १० लाख रुपये दराने मोबदला देण्यात यावा. सेक्शन ९ नंतर रजिस्ट्री झालेल्यांना चालू सातबाऱ्याप्रमाणे नोकरी देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी दिल्यानंतरच काम सुरू करावे अन्यथा मोठा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन राजुरा तहसीलदारांना प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. याप्रसंगी विठ्ठल कावळे, तुळशिराम काटवले, बाबुराव आस्वले, पंढरी काटवले, अनिल पोटे, अमोल काटवले, नथ्थू काटवले, ज्ञानेश्वर काटवले, मधुकर काटवले, आनंदराव चिकनकर, संतोष चौधरी, शेषराव बोंडे, अरुण काटवलेसह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.वेकोलिने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती बदल्यात आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे मान्य केले. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांचा मोबदला मिळालेला नाही व नोकऱ्याही मिळालेल्या नाहीत. तरीही वेकोलिने कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. वेकोलि आपल्या सोईनुसार शेतकऱ्यांचा मोबदला व नोकरी देत असून ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास वेकोलि विरोधात जनआंदोलन छेडून सुरू झालेले काम बंद पाडू.- शेषराव बोंडे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, साखरी