शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

वेकोलीच्या मुजोरीपुढे प्रकल्पग्रस्तांचे चालेचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:26 AM

राजुरा : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोली प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वेकोलीकडून प्रकल्पग्रस्तांना अतिशय खालच्या दर्जाची ...

राजुरा : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोली प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वेकोलीकडून प्रकल्पग्रस्तांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देत असल्याची बाब या घटनेने पुढे आली आहे. वेकोलीच्या मुजोरीपुढे प्रकल्पग्रस्तांचे काहीएक चालत नसल्याचे आता प्रकल्पग्रस्त उघड बोलू लागले आहेत. राजुरा तालुक्यात तब्बल १२८० वेकोली प्रकल्पग्रस्त न्यायासाठी अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, न्याय कधी मिळेल ठाऊक नाही, अशी केविलवाणी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झालेली आहे.

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत राजुरा तालुक्यात अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींसाठी हजारो हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. १०० टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळाला नाही. काहींना मोबदला मिळाला नाही, तर काहींना नोकरी मिळाली नाही. तालुक्यात १२८० प्रकल्पग्रस्तांचा तब्बल १० वर्षांपासून वेकोली प्रशासनासह संघर्ष सुरू आहे. शेकडो बैठका झाल्या. अनेक आंदोलने झाली. मात्र, न्याय कुठेही मिळाला नाही. तो केव्हा मिळेल, याची शाश्वती नाही. केवळ आश्वासनाचे गाजर दाखवले जात आहे.

पोवणी-२ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ६ वर्षांपासून रेंगाळतोय.

३० मार्च रोजी पोवणी-२ कोळसा खाणीमध्ये शेती गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी वेकोलीची वाहतूक रोखून धरली होती. आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. गेल्या सहा वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळत आहे.

सुबई-चिंचोली प्रकल्पग्रस्तांचा १० वर्षांपासून संघर्ष

सुबई-चिंचोली प्रकल्प २०११ पासून सुरू आहे. गेल्या १० वर्षांत सभांचा फार्स सुरू आहे. हाती काहीच आले नाही. या प्रकल्पात शेतकऱ्यांची ४०० हेक्टर शेती गेली आहे. सुमारे २०८ शेतकरी नोकरीसाठी धडपडत आहेत. न्याय मिळालाच नाही.

सास्ती यूजी टू ओसी प्रकल्पात १०८० शेतकऱ्यांना नोकरीची प्रतीक्षा

सास्ती यूजी टू ओसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ८७२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १०८० शेतकरी वेकोली व शासकीय अधिकाऱ्यांसह नेतेमंडळींचे उंबरठे झिजवत आहे. न्यायाचा पत्ता नाही.

साखरी-पोवणी-धोपटाळा प्रकल्पात नोकरीसाठी २२ प्रकल्पग्रस्तांच्या येरझारा

साखरी-पोवणी-धोपटाळा प्रकल्पात नोकरीसाठी २२ प्रकल्पग्रस्तांच्या येरझारा सुरू आहे. वेकोली व्यवस्थापन थातूरमातूर उत्तरे देऊन मोकळे होत आहे. नाल्याचा प्रश्नही प्रलंबित आहे.

वेकोलीच्या मुजोर धाेरणाचा फटका

प्रकल्पच आला नसता तर शेतकरी भूमिहीन झाले नसते. आपल्याच शेतीच्या मोबदल्यासाठी त्यांना हा संघर्ष करण्याची गरज भासली नसती. आता त्यांना आपल्याच शेतीच्या मोबदल्यासाठी वेकोली व्यवस्थापनाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत आहे. अधिकारीवर्ग मात्र त्यांना हीन दर्जाची वागणूक देतो. अनेकदा अपमानित केले जाते. आपल्या शेतजमिनी देऊन पाप केले, अशी भावना शेतकऱ्यांची झालेली आहे.

नेतेमंडळी का नाही मिळवून देऊ शकत न्याय

शेतकरीबांधव आपल्या शेतीच्या मोबदल्यासाठी चकरा मारतो आहे. त्यांना अपमानित व्हावे लागते आहे. कित्येक वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. कुठेतरी न्याय मिळावा म्हणून नेतेमंडळींकडून मोठ्या अपेक्षा असतात. या मंडळींनी मनात आणले तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाची गाथा बघितल्यास अपवाद वगळता न्याय मिळाला नसल्याचेच चित्र आहे.