शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:51 PM

जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, गोविंद सारडा, रामू तिवारी, अजय मस्के, मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या नावात आद्याक्षर 'च' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टांना पूर्ण करावाच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा. यासाठी २४ तासांचे योग्य नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो अथवा बाबुपेठमधला सामान्य विद्यार्थी असो, मेहनत करण्यासाठी २४ तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासांचा सद्पयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूरमधून आॅलंम्पिकपटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाºया मिशन सेवा या दोन उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून आॅलंम्पिकसाठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि २४ तासांची योग्य आखणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे. भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की, 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे ' तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.आदिवासी युवकांच्या ‘मिशन शौर्य’ची आठवणयावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला. ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमानाएवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते. माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.