शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 12:52 AM

चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो.

प्रेरणादायी उपक्रम : इको-प्रोची अविरत स्वच्छता मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो. इको प्रो. नामक एका युवा संघटनेने ५५० वर्षे जुन्या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम गेल्या ६८ दिवसांपासून अविरत सुरू ठेवली आहे. आपला इतिहास लख्ख स्वरूपात पुढे यावा, यासाठी नव्या पिढीची धडपड प्रेरणादायी ठरत आहे.चंद्रपूर शहर म्हणजे गोंडराजांची राजधानी. ५५० वर्षे जुन्या या राजधानीला ७ किलोमीटरचा भूईकोट किल्ला लाभला आहे. मात्र, लोकांच्या अनास्थेमुळे हा भुईकोट किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इको प्रो या संस्थेच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रमदानातून या किल्ल्यास नवीन रूप मिळत आहे. चार भव्य दरवाजे, पाच खिडक्या, ३८ बुरुज आणि ७ किलोमीटर लांबीचा परकोट शहरात आहे. याच या भुईकोट किल्ल्यात गोंडराजांनी चंद्रपूर ही आपली राजधानी वसवली आणि जवळपास ३०० वर्षे राज्य केले. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपुरातील युवांचा समावेश असलेल्या इको प्रो. नामक स्वयंसेवी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साद देत हा ऐतिहासिक वारसा लख्ख स्वरूपात पुढे आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून इको प्रो. या संस्थेचे ४० कार्यकर्ते अविरत परिश्रम करून शहरातील किल्ले आणि परकोट स्वच्छ करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या मेहनतीमुळेच आज किल्ल्यांना नवीन रूप मिळाले आहे. ६८ दिवसांआधी दिसणारा परकोट आज अगदी थक्क करणाऱ्या स्वरूपात लोकांपुढे आला आहे. भुईकोट किल्ला ताडोबाहून अधिक पर्यटक खेचून आणू शकतो. याकडे आजवर दुुर्लक्ष झाले. कधीकाळी या साडेसात किमी परकोटाची देखभाल आणि संरक्षण घोडदळाद्वारे केले जायचे, हे ऐकूनही खरे वाटत नाही. मात्र, आपल्या इतिहासाची माती करण्यात आपण सर्वच आघाडीवर असल्याचा इतिहास असल्याने चंद्रपूरच्या परकोटाचे व्हायचे तेच झाले. मात्र, या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व ओळखून राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान ६९ व्या दिवसांत प्रवेशले असल्याने आतातरी नागरिक, प्रशासन आणि पुरातत्व खात्याने डोळे उघडावे, अशी कळकळीची अपेक्षा इको-प्रोच्या युवकांनी व्यक्त केली.