शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

कोळसा उपलब्ध; टळले महानिर्मितीचे संकट, चंद्रपूर वीज केंद्रात आठवडाभराचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 12:50 IST

राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे.

राजेश मडावी

चंद्रपूर : उन्हाची तीव्रता घसरू लागल्याने विजेची मागणी थोडी कमी झाली आहे. त्यामुळे कोळसा टंचाईने हैराण झालेल्या महानिर्मितीवरील संकटही काही प्रमाणात टळले आहे. राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे.

महानिर्मितीचे राज्यात सात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. या केंद्रातून दररोज सव्वा लाख ९५४० मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते. मात्र, मार्च २०२२ पासून देशात कोळसा टंचाई सुरू झाल्याने महानिर्मितीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. दैनंदिन कोळशाची गरज सव्वा लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना कोळसा कंपन्यांकडून केवळ ८०-८५ मेट्रिक टन कोळसा मिळत होता. त्यामुळे वीज केंद्रांवरील काेळशाचा साठा एक दिवस पुरेल एवढा घसरला.

वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा

कोराडी, नाशिक, भुसावळ, परळी, पारस, चंद्रपूर, खापरखेडा या चार वीज केंद्रांतून राज्यात वीजनिर्मिती सुरू आहे. यातील चंद्रपूर व काेराडी केंद्रात सहा दिवसांचा कोळसा उपलब्ध आहे. परळी व भुसावळ केंद्रात सर्वाधिक १० ते ११ दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. नाशिक दोन दिवस, तर खापरखेडा वीज केंद्रात पाच दिवस पुरेल एवढा कोळसा असल्याने फार अडचण येणार नाही, असा अंदाज महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटchandrapur-acचंद्रपूर