शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:59 PM

इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते.

ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : नागरकर व देशमुख यांच्यात धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नंदू नागरकर आणि सभागृहनेते वसंत देशमुख यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यात आणखी काही नगरसेवक गुंतल्याने रणक्रंदन माजले. विविध मुद्यांवरून उठलेले वादंग शांत होत नसल्याने अखेर काँग्रेसच्या व इतर नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.पावसाळा संपायला आला तरी उन्हाळ्यापासून कपात केलेला पाणी पुरवठा पूर्ववत नियमित केला नाही. जाणीवपूर्वक चंद्रपूरकरांना पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे. मनपाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मडके घेऊनच सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे आमसभा सुरू होताच वादळ उठले. पावसाळा सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत पाणी पुरवठा नियमित का केला नाही, असे विचारत नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढिया व इतर नगरसेवकांनी सभागृहातच मडके फोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षातील व विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू झाली.नाले सफाईच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यानंतर परत निविदा काढण्याऐवजी मनपाच्या स्थायी समितीत सदर कंत्राटाला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर व स्थायी समिती सभापती यांना जाब विचारला. स्थायी समितीची सभा दर आठवड्यात होते. त्यामुळे आठवड्याची किंवा एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ कोणत्या निकषावर देण्यात आली, असे नागरकर यांनी म्हटले. त्यानंतर सभागृह नेता वसंत देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. दोघेही एकमेकांवर धाऊन गेले. दरम्यान नगरसेवक संदीप आवारी, सुरेश पचारे, दीपक जयस्वाल व काही नगरसेवकांनी मधे येऊन दोघांनाही सावरले. तरीही यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया, दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, प्रहारचे पप्पु देशमुख यांनी सभागृह नेता वसंत देशमुख हे मद्य प्राशन करून असल्याचा आरोप करीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. हा गोंधळ जवळपास १५-२० मिनिटे सुरूच होता. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली व त्या सभागृहाबाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर सभा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जेल मार्गाचे शहीद बाबुराव शेडमाके मार्ग असे नामकरण करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर यांनी सांगितले.‘पाणी द्या महापौर’ आंदोलनआमसभा सुरू असतानाच महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मडके घेऊन ‘पाणी द्या महापौर’ आंदोलन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात मुबलक जलसाठा आहे. धरणाचे दोन दरवाजे काही दिवसांपूर्वी उघडावे लागले. तरीही चंद्रपूरकरांना दररोज पाणी दिले जात नाही. हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बँड पथकही आणण्यात आले होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुनिता लोढिया, अमजद खान व काँग्रेस नगरससेवक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या धोरणाचा निषेध करण्यात आला व निदर्शने देण्यात आली.गांधी जयंतीपासून पाणीसभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच महापौर अंजली घोटेकर यांनी २ आॅक्टोबर गांधी जयंतीपासून चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली. या संदर्भात पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.