शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
3
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
5
Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग?
6
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
7
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
8
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
9
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
10
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
11
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
12
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
13
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
14
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
15
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
16
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
17
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
18
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
19
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
20
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा

कोरोना पावला : अडीच लाख विद्यार्थी होणार विना परीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:27 AM

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शाळा बंद होत्या. मध्यंतरी ५ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, त्यातही ...

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शाळा बंद होत्या. मध्यंतरी ५ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, त्यातही विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्पच होती. दरम्यान, आता आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मात्र, जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन किंवा ऑफलाईन जुळलेलेच नव्हते. त्यांचे मात्र भविष्यात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकटाने तोंड वर काढले. दरम्यान, परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोरोना संकट वाढतच गेल्याने चालू शैक्षणिक वर्षातही प्राथमिकच्या तर शाळाच भरल्या नाही. दरम्यान, पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या. त्यापूर्वी ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. दोन महिने विद्यार्थी शाळेत जात नाही तोच पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. आता तर आठव्या वर्गापर्यंच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकले नाही त्यांना लाभ होणार आहे. मात्र, एकूणच विद्यार्थ्याकडे बघितल्यास मागील वर्गाचा अभ्यास न करताच पुढील वर्गात प्रवेश दिल्यामुळे पुढील वर्गातील अभ्यास या विद्यार्थ्यांना झेपेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, कोरोना संकटामुळे शासनाकडेही पर्याय नसल्याने हा निर्णयही योग्यच म्हणावा लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली २८८२४

दुसरी ३१२७२

तिसरी ३१७८४

चौथी ३३७१९

पाचवी ३२८४५

सहावी ३२३५७

सातवी ३३१६१

आठवी ३३४४१

बाॅक्स

शिक्षकतज्ज्ञ म्हणतात,...

कोरोना रुग्ण संख्या बघता हा निर्णय योग्य वाटतो. तसेही आरटीई अंतर्गत आठव्या वर्गापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बघता ते भरून काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

-जे. डी. पोटे

शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर

कोट

विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने संकतील मूल्यमापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट पास केल्यास अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. शासनाने निर्णय जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना वर्गन्नोती करताना गुण कसे देणार यावर स्पष्ट दिशानिर्देश देणे आवश्यक आहे.

-प्रकाश चुनारकर

शिक्षक, चंद्रपूर

---

इयत्ता पहिली ते आठवीला वरच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय अपेक्षितच होता. तसेही नापासचे धोरण नसल्याने या निर्णयाने फारसा फरक पडणार नाही. इयत्ता १ ते ४ सुरूच न झाल्याने त्यांचा पुढच्या सत्रात दोन्ही वर्षाचा पाठ्यक्रम भरून काढावा लागेल, इयत्ता ५ ते ८ चे विद्यार्थी मिळालेल्या वेळेत बऱ्यापैकी शिक्षण प्रवाहात ठेवता आले.

-हरीश ससनकर

शिक्षक, पोंभूर्ण