शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कपाशीने बदलला रंग; शेतकरी झाले हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 1:13 PM

पिके पडली पिवळी : सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिकसह धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकेही घेतली जाते. मात्र, मागील पंधरवड्यापासून रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण केले. सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीनचे पीक पिवळे पडले असून, काही ठिकाणी सडून खराब होत आहे. कुठे पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिकांवर विविध प्रकारची रोगराई वाढत आहे. परिणामी, यंदा उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, या विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सूर्यनारायणाचे दर्शनही होत नसल्याची स्थिती आहे. सतत रिमझिम पावसामुळे कपाशी पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी जूनमध्ये खरीप हंगामाची पेरणी केली. काहींनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली.

कापूस उत्पादक तालुकेजिल्ह्याची ओळख धान उत्पादक अशी असली तरी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. यामध्ये राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन तर ब्रह्मपुरी, सावली, सिदेवाही, मूल, पोंभुर्णा, नागभीड, गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरम्यान, धान, आणि कापूस हे दोन्ही पीक काही तालुक्यांमध्ये घेतल्या जाते.

शेतकरी म्हणतात...."मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीवर रोगराई तसेच पिके पिवळी पडत आहे. त्यामुळे यावर्षी लावलेला खर्च निघणार की नाही, ही चिंता प्रत्येक शेतकऱ्याला आहे. शेतकरी पिकांची जोपासणा करण्यासाठी फवारणी करीत आहे. मात्र, पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनची हीच अवस्था आहे."- प्रमोद लांडे, शेतकरी, गोवरी

"सतत दोन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, संपूर्ण पीक पिवळे पडले आहे. संबंधितांनी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी."- विजय धोटे, शेतकरी, 

टॅग्स :CropपीकfloodपूरfarmingशेतीFarmerशेतकरी