शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:20 AM

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात जोमदार झाली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस बरसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची ...

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात जोमदार झाली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस बरसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची अल्पावधीतच पेरणी केली. बुधवारपर्यंत जिल्ह्यात किती हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या, याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी तालुक्यात दरवर्षी सोयाबीन व कापूस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदाही हजारो शेतकऱ्यांनी या दोन पिकांनाच प्राधान्य दिले. सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकवून टाकल्या. आता दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने अंकूर करपण्याच्या स्थितीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. बोअरवेल व विहिरींसारख्ये स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांचा कसाबसा सांभाळ केला, परंतु अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. येत्या तीन- चार दिवसांत पाऊस बरसला नाही, तर पहिल्या पेरणीतील पिके तग धरण्याची शक्यता नाही. अनेकांना दुबार पेरणी करण्यासाठी नवीन बियाणे विकत घेण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बोगस बियाण्यांनी केला घात

जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये, यासाठी पथके गठीत केल्याचा दावा कृषी विभागाने केला, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजुरा, गोंडपिपरी व कोरपना तालुक्यात बोगस बियाणे सहजपणे मिळत होते, अशी माहिती आहे. काही शेतकऱ्यांनी बोगस बियाणे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसावरचे अवलंबित्व, खतांची अनुपलब्धता, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी पिकांचे पाडलेले भाव, पीककर्ज देण्यास बँकांकडून नकार आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

धान उत्पादक शेतकरीही चिंतित

सोयाबीन व कापूस उत्पादकांपेक्षा धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रोवणीसाठी जादा पाण्याची गरज भासते. पऱ्हे टाकायला मध्यम पाऊस असला, तरी पुरेसा आहे, परंतु यंदा धान उत्पादक तालुक्यातच पावसाचे प्रमाण कमी आहे. रोवणीसाठी शेतकरी जमीन तयार करून ठेवण्यास सज्ज झाला. समाधानकारक पाऊसच नसल्याने मशागतीच्या कामांवर विलंब होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.