शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 4:19 PM

पुरामुळे पिके गेली सडून; शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : पूर आला आणि सर्व काही घेऊन गेला. यात बळीराजा मात्र पुरता संकटात सापडला आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार वेळी पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मिरची पिके भुईसपाट झाली. हे बघून बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील प्रदीप आनंदराव मोरे यांचे मिरचीचे पीक पुरामुळे शेतातच सडून गेले. मात्र लागवड करताना लावलेल्या मजुरांना मजुरी देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आपली बैलजोडी विकून त्या पैशाने मजुरी द्यावी लागल्याची दुर्दैवी वेळ आली.

शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना खंबीरपणे व न डगमगता करावा व आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, यासाठी शासन शेतकऱ्यांसोबत आहे, असा गाजावाजा शासन वेळोवेळी करीत आला आहे. असे असले तरी खरी परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने संकटात कोणीच उभे राहत नाही, हे वारंवार दिसून आले आहे.

अतिवृष्टी, पुराने नासाडी झालेल्या पिकांची व पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा होईल अशी आशा होती. पदरी मात्र सध्या तरी निराशाच आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात वर्धा नदी समांतर वाहत असून पुराच्या पाण्याने अनेक गावे बाधित झाली आहेत. जुलैपासून वर्धा नदीला चार वेळा पूर आले. आधी सोयाबीन,कापूस, तूर, धान पिके गेली आणि आता मिरची व मूग पिके पुरात बुडाली.

शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी पीक कर्ज घेतले, कर्जबाजारी होत बियाणे, खते व औषधी घेऊन शेतीची पेरणी केली. पिके हिरवीगार झाली अन् बळीराजा सुखावला. सोयाबीन पीक हातात येणार अशातच, पुन्हा एकदा पुराचे सावट आले नाही. होत्याचे नव्हते झाले. या संकटात शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आपली शेती उभी करण्यासाठी बळीराजाला आपली बैलजोडी विकावी लागली आणि मजुरी द्यावी लागल्याचे दुःख समस्त शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीLabourकामगार