शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे कोट्यवधी रुपये थकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:48 IST

Chandrapur : चंद्रपूरसह राज्यातील काही इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांनी आता न्यायालयात धाव घेतली

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिला जातो. मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सेल्फ फायनान्स इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे कोट्यवधी रुपये शासनाने थकविले आहे. हा आकडा दरवर्षी फुगत आहे. परिणामी शाळा संचालक अडचणीत आले आहेत. प्रतिपूर्तीची रक्कम मिळत नसली तरी दरवर्षी मात्र आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मात्र द्यावा लागत आहे. त्यामुळे 'इकडे आड-तिकडे विहीर' अशी अवस्था इंग्रजी शाळांची झाली आहे. दरम्यान, चंद्रपूरसह राज्यातील काही संस्थाचालकांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे.

समाजातील वंचित घटकातील  विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देता यावे यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरकारकडून शाळेला प्रति वर्ष अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, हे अनुदान मागील काही वर्षांपासून थकविले आहे. अनुदान मिळत नसल्याने मागील वर्षी आरईटी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता. 

मात्र, प्रशासकीय दबावानंतर त्या शाळांना प्रवेश द्यावा लागला. दरवर्षीचे थकीत अनुदान वाढत असून, आता तर हा आकडा २ हजार ३०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. दरम्यान, राज्य शासनाने यावर्षी केवळ २०० कोटी रुपये मंजूर करून संस्थाचालकांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

यावर्षीची स्थितीएकूण शाळा - ८८६३      जागा - १०९०८७आलेले अर्ज - ३०५१५२विद्यार्थी निवड - १०१९६७प्रवेश निश्चित - ६७४१०

"मागील अनेक वर्षापासून शासनाने आरटीई अंतर्गत अनुदान थकविले आहे. दरवर्षी हा आकडा वाढत आहे. त्यामुळे शाळा आता आर्थिक अडचणी सापडल्या आहेत. शासनाने या शाळांचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शिक्षण प्रतिपूर्ती रक्कम सरकार देणार नाही तर भविष्यात शाळा देखील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार नाही. ही भूमिका इंग्रजी शाळा संघटना घेतील. न्याय मागण्यासाठी आता आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे."- प्रशांत हजभजन, जिल्हाध्यक्ष, इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल, असोसिएशन, चंद्रपूर.

"राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. दुसरीकडे शाळांची अनुदानाची रक्कम सरकार देत नसल्याने संस्थाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहे. सरकारने शाळांचा विचार करून थकीत असलेली रक्कम अदा करावी."- पी. एस. आंबटकर, अध्यक्ष, एसएसपीएम ग्रुप, चंद्रपूर

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षणMONEYपैसाchandrapur-acचंद्रपूर