शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

दुकान बंद करतानाच उसळते ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:19 AM

बल्लारपूर : ग्राहकांची दुकानावर एकाचवेळी गर्दी होऊ नये याकरिता दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची ठराविक वेळ शासनाने कोरोना ...

बल्लारपूर : ग्राहकांची दुकानावर एकाचवेळी गर्दी होऊ नये याकरिता दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची ठराविक वेळ शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय ठरवून दिलेली आहे. दुकानदारांकडून त्यांचे पालन होत आहे. मात्र नेमके दुकान बंद होण्याच्या बेतातच ग्राहक दुकानावर येतात आणि गर्दी करतात. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.

दुकान बंदची वेळ सकाळी ११, दुपारी २, सायंकाळी ४ ची असो, दर वेळेला असेच होत असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे सामान देताना आमची धांदल उडते. आणि ज्या उद्देशाने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळ ठरवून दिली आहे, त्याचा फज्जा उडून गर्दी होते, अशी व्यापाराची तक्रार आहे. लोकांच्या सोयीकरिता तसेच दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी वेळ ठरवून दिली आहे. जेणेकरून ग्राहक मोकळे मोकळे होऊन यावे. पण, ग्राहक दुकान ४ वाजता बंद होणार आहे ना, असे म्हणत नेमके ४ वाजताच दुकानात येतात. बहुतेक सारे ग्राहक तसाच विचार करीत असल्याने दुकान बंद करण्याचे वेळेला दुकानावर गर्दी होते. यातून ग्राहकांच्या निष्काळजीपणा दिसून येतो. आणि अशा गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण मिळते. ग्राहकांनी याची काळजी घ्यावी असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आलेल्या ग्राहकांना परत पाठविणे ही शक्य होत नाही, असे याबाबत व्यापारी म्हणतात.