शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

बापरे! मायनस ५ अंश सेल्सिअस तापमानात ‘ते’ युक्रेन बॉर्डरमध्ये उघड्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

 युक्रेनमध्ये  वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी  रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्बचा हल्ला करीत आहे. अशा युद्धजन्य स्थितीत तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड  या देशाच्या सीमेवर पाठविले जात आहे.

अमोद गौरकरशंकरपूर : रशिया-युक्रेन  युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात असून मागील दोन दिवसांपासून मायनस पाच डिग्री सेल्सिअस थंडीमध्ये बिस्किटे खाऊन ते विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रात्र काढत आहेत. त्या बॉर्डरवर भारतीय दूतावासाचा कोणताही अधिकारी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वारंवार उडवाउडवीची उत्तरेच विद्यार्थ्यांना मिळत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर अधिकाऱ्यांशी बोलतानाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओही लोकमतकडे उपलब्ध आहे.  युक्रेनमध्ये  वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी  रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्बचा हल्ला करीत आहे. अशा युद्धजन्य स्थितीत तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड  या देशाच्या सीमेवर पाठविले जात आहे. या देशामध्ये जाण्यासाठी बरेच विद्यार्थी त्या मार्गाने गेले. या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी भारतीय दूतावासाने पांढऱ्या रंगाची बसही दिली; परंतु त्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे जवळपास ३५ ते ४० किलोमीटर विद्यार्थी पायी प्रवास करून पोलंड  देशाच्या सीमेपर्यंत पोहोचले; परंतु युक्रेनच्या सीमा रक्षकांनी त्यांना पोलंडच्या  सीमेवर जाण्यास बंदी घातली.  जोपर्यंत भारतीय दूतावासाकडून विस्तृत माहिती अथवा परवानगी येत नाही, तोपर्यंत पोलंडमध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना  एक दिवस आणि एक रात्र  काढावी लागत आहे. तापमान कमी  असल्याने त्रास अधिकरच वाढला आहे.

अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली - युक्रेनच्या बॉर्डरवर ज्या ठिकाणी विद्यार्थी अडकले आहेत, तिथे उणे पाच डिग्री तापमान आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीची भारतीय विद्यार्थ्यांना सवय नसल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे. तेथे कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी हतबल होत आहे. भारतीय विद्यार्थी एकमेकाला आधार देत असले तरी मनाने ते खचत आहेत. 

 मोबाईलचे चार्जिंगही संपले  - विद्यार्थी उघड्यावरच राहत असल्याने त्यांच्या मोबाईलचे चार्जिंग होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद पडले आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांचा त्यांच्या मुलांशी संवाद होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक योजना तयार करून दहाजणांचा ग्रुप तयार केला आणि त्यात दहाजणांच्या ग्रुपमध्ये प्रत्येक दिवशी एकाजणाचा मोबाईल सुरू ठेवण्यात येत असून ते नंबर त्यांनी पालकांना दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कसाबसा तरी पालकांशी संपर्क होत आहे.

जवळचे खाद्यपदार्थही संपत आलेविद्यार्थ्यांजवळ असलेले बिस्कीटचे पाकीट व इतर खाद्य संपत आले आहे. तिथे पाण्याची कमतरता असून घोटभर पाण्यात ते आपली तहान भागवून दिवस पुढे ढकलत आहेत. अशा बिकट परिस्थितीत भारतीय विद्यार्थी त्या सीमेवर थांबून असल्याने इकडे पालकांना चिंता वाटू लागली आहे. जवळपास दोन हजार विद्यार्थी व लोक त्या सीमेवर अडकून असल्याची संपूर्ण माहिती तिथे असलेल्या ऐश्वर्या खोब्रागडे हिने आपल्या पालकांना दिली. तिचीही चिंता पाहून पालक प्रफुल्ल खोब्रागडे अतिशय चिंतेत आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध