शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही चांदागड करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 14:16 IST

पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी अस्मितेचा प्रश्न चंद्रपूर होती गोंड राजाची राजधानी चांदागढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबादचे नाव बदलण्याची भाषा करताच देशभरात चर्चा सुरू झाली. शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच संभाजी ब्रिगेडने पुण्याचे जिजापूर नामकरण सुचविले आहे. त्यापाठोपाठ आदिवासी संघटनांनी आता चंद्रपूर शहराचे नाव चांदागढ करण्याची मागणी पुढे केली आहे.पूर्वी चांदागढचे गोंड राज्य होते. इंग्रजांनी चांदागढावर आक्रमण करून हे राज्य ताब्यात घेतले. प्रशासकीय कामासाठी १८५९ मध्ये चांदा जिल्ह्याची निर्मिती केली. त्यात मुल, वरोरा, ब्रम्हपुरी या तीन तालुक्यांची निर्मिती करून समावेश केला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ११ जानेवारी १९६४ रोजी चांदाचे नामांतर चंद्रपूर असे करण्यात आले. त्यासाठी शासन निर्णय क्र. एन.एम.सी.१०६३ बी निर्गमित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे बल्लाळसिंह या गोंड राजाच्या नावावरून त्याच्या राजधानीला बल्लारशहा असे नाव होते. आज त्या शहराला बल्लापूर नावाने ओळखले जाते.गोंडवाना एक्सप्रेसचे नाव का बदलले?ज्या पद्धतीने नावे बदलली जात आहे किंवा बदलण्याची मागणी होत आहे, त्याचा फटका प्राचीन गोंडवाना साम्राज्यातील शहरे, रेल्वेस्थानक व रेल्वेगाड्यांच्या नावांना बसत आहे. गोंडवाना या अस्मिताप्रधान शब्दालाही फटका बसत असल्याची खंत बिरसा क्रांतीदलाने व्यक्त केली आहे. भोपाळमधील बैरागढ रेल्वेस्थानकाचे नाव बदलून हिरदाराम करण्यात आले. ३१ मार्च २०१३ रोजी हजरत निजामुद्दीन जबलपूर गोंडवाना एक्सप्रेसचे नाव व नंबरसुद्धा बदलविण्यात आला आहे. पूर्वी १२४११ व १२४१२ या दोन क्रमांकाच्या रेल्वे हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या नावाने जबलपूरपासून दिल्लीपर्यंत धावत होत्या. आता मात्र या गाडीचा नंबर २२१८१, २२१८२ असा करण्यात आला. जबलपूर हजरत निजामुद्दीन सुपर एक्सप्रेस असे नामांतर करून गोंडवाना शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे गोंडवानातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील आदिवासी समाजात रोष आहे.गौरवशाली इतिहासाचे विस्मरणनावे बदलण्याच्या प्रक्रियेत आदिवासींचा गौरवशाली इतिहास पुसला जात आहे. गढामंडला, चांदागढ, देवगढ, खेरलागढ या ठिकाणी गोंड राजाची राज्ये होती. आज त्यांचीच ओळख पुसली जात आहे, अशी खंत आदिवासी अभ्यासक प्रमोद घोडाम यांनी व्यक्त केली.रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन गोंडवाना एक्सप्रेस नाव बदलल्याबाबत जाब विचारला जाईल. गोंडवाना एक्सप्रेस आणि चंद्रपूरबाबत बिरसा क्रांती दल देशभर जनआंदोलन उभे करेल.- दशरथ मडावी,राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, बिरसा क्रांतीदल

टॅग्स :agitationआंदोलन