शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी दंगानियंत्रण पथक तैनात

By admin | Published: March 03, 2017 12:51 AM

स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी

उत्पादन ठप्प : दुसऱ्यादिवशीही आंदोलन सुरुचमाजरी : स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी व मोबदल्याच्या मागणीसाठी पुकारलेले खाण बंद आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. रात्रभर महीला वर्ग कोळसा खदानीतच होत्या. बुधवारी सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाल्याने वेकोलिचे उत्पादन ठप्प पडून कोट्यवधींचा फटका वेकोलिला बसला आहे.वेकोलि व्यवस्थापनाने आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकासह पाचारण केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही वेकोलि व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्ताची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही व यावर कुठलाही तोडगा काढला नाही. दुसरीकडे जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: येऊन दखल घेत नाही व नोकरी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. वेकोलि व्यवस्थापनाने आम्हाला मंडप टाकण्यास मनाई केली आहे. काल रात्रभर आम्ही येथेच कोळशावर बसून राहिलो. आज पुन्हा भर उन्हात आंदोलन करीत आहोत, अशी माहिती प्रकल्पग्रस्त लिलेश ठवस व प्रहार संघटनेचे अमोल डुकरे यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. वेकोलि व्यवस्थापनाने जून २०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहीत करुन शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्या बदल्यात तीन महीन्यात प्रकल्पग्रस्ताना नोकरीवर रुजु करु, असे आश्वासन देऊन त्याना प्रशिक्षणसुध्दा दिले. मात्र गेल्या दोन वर्षापासून नोकरी दिली नाही. वेकोलिने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. वेकोलिच्या भूमी अधिग्रहनात ३५० प्रकल्पग्रस्त असून त्यातील १२० प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. या आंदोलनस्थळी दोन दिवसांपासून नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्रवीण सूर, भाजपाचे नेते उमेश बोडेकर, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, काँग्रेसचे विजय देवतळे, आसावरी देवतळे हे भेट देत असून अधिकारी व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करीत आहेत. यावेळी वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी, भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदिप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मिराबाई ढवस हे सहकुटुंब सहभागी झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने प्रहारचे संस्थापक व आमदार बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. आ. बच्चू कडू यांनी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना यांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी न देता प्रकल्प सुरू कसा केला, याविषयी जाब विचारला. यावर भद्रावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तात्काळ बैठक बोलावली आहे. (वार्ताहर)