शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कुसंगाने विनाशच साधेल

By admin | Published: January 12, 2016 12:57 AM

सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, ...

स्वामी गोविंददेव महाराज : श्रीरामकथा प्रवचनमालेचे पाचवे आख्यानचंद्रपूर : सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, कारण त्याचा शेवट पतनातच होणार असल्याचा हितोपदेश आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी केला. येथील चित्रकुट धाममध्ये चाललेल्या श्रीरामकथा मालेत पाचवे पुष्प गुंफताना स्वामीजींनी कैकयी-मंथरा प्रसंगाचे निरुपण केले. कलंकाची ज्याला काळजी असते, तोच मुळात संवेदनशील असतो. त्याचेच अंत:करण शुध्द असते. राम वनवासाचा संदर्भ देत ते म्हणाले, त्यागाला कठीण परीक्षेतून जावे लागते. आज राष्ट्र-धर्म परंपरा वाचवायलासुध्दा त्यागाचीच गरज असल्याची गरज आचार्य स्वामीजींनी प्रतिपादित केली. कथेतील पाचव्या दिवसाचे मुख्य यजमान लीलाराम उपाध्याय, राजमान सुधाकर चकनलवार, नरसिंगदास सारडा यांनी ग्रंथाची आरती केली. नागपूरहून आलेल्या अशोक करवा, गडचिरोलीचे माधोलाल शर्मा, डॉ. सुशील मुंधडा, कृषी अधिकारी देशमुख, डॉ. कुबेर कोतपल्लीवार, डॉ. विलास झुल्लरवार, कोल डिलर्स असोशिएशनचे सुरेश अग्रवाल, माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश राठी, अजय मेहता, महावीर मंत्री, रामकथा ज्ञानयज्ञ समितीच्यावतीने रोडमल गहलोत, विदर्भ माहेश्वरी सभेचे रामेश्वरलाल काबरा यांनी स्वामीजींचे विशेष आशीर्वचन घेतले. मुलांनी वेधले लक्षगिता परिवाराच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या शाळेतील २१ बालकांनी सोमवारी श्रीराम कथामालेच्या व्यासपीठावर गिता वाचन केले. त्यामुळे वातावरणात भक्ती-श्रध्देचा वेगळाच रंग भरला गेला. श्रीगणपती अथर्व शिर्ष आणि भगवत गितेतील १५ व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. एक सूर, एक ताल असा मेळ जमल्याने वातावरण भारुन गेले. यावेळी मार्गदर्शक शिला उपाध्याय, माया उपाध्याय, सुनिता सोमानी, सरिता उपाध्याय यांनी मुलांचा उत्साह वाढविला.