शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

महाकाली मंदिरात राज्यभरातील भाविक येणार; पण सोयीसुविधांचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:34 IST

नागरिकांचा सवाल: मुख्यमंत्री तीर्थ दर्शनाच्या ६६ स्थळांमध्ये महाकाली मंदिराचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी महाराष्ट्रातील ६६ तीर्थ क्षेत्रांच्या यादीत चंद्रपुरातील माता महाकाली मंदिराचा समावेश केला. त्यामुळे राज्यभरातील ६० वर्षांहून अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक दर्शनासाठी मंदिरात येतील. मात्र, या भाविकांच्या सोयीसुविधांचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत राज्य सरकार आता ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडविणार आहे. पात्र व्यक्तीचा प्रवास, निवास व भोजनाचा खर्च सरकारच उचलणार आहे. आता चंद्रपुरातील ज्येष्ठांना राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल. राज्यातील ६६ स्थळांच्या यादीत विदर्भातील अष्टदशभूज रामटेक, दीक्षाभूमी नागपूर, चिंतामणी कळंब आणि गोंड राजांनी बांधलेले चंद्रपुरातील ऐतिहासिक माता महाकाली मंदिराचाही समावेश आहे.

अशा आहेत समस्या

  • श्री महाकाली मंदिर परिसरात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र नवरात्री दरम्यान यात्रा भरते. नांदेड, मराठवाडा व तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक अनेक संकटे सहन करून यात्रेत सहभागी होतात. मात्र, यात्रा परिसरात भाविकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. निवास, शौचालय, स्नानगृहे, भोजनकक्ष व्यवस्था अत्यंत तोकड्या आहेत.
  • महिला भाविकांना तर उघड्यावरच दैनंदिन कार्य उरकावे लागत आहे. संरक्षित सभामंडप नसल्याने नैसर्गिक आपत्ती प्रसंगी तारांबळ उडते. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत मंदिराचा समावेश 3 होणे आनंदाची बाब आहे. मात्र, महाराष्ट्रातील अन्य मंदिरांच्या तुलनेत येथे सुविधाच नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची आबाळ होण्याची भीती आहे.

चंद्रपूरकरांना परराज्यात तीर्थाटनाची संधीयोजनेसाठी पात्र ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रासह इतर राज्यातील जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातील प्रमुख तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.

२५० कोटींची चर्चामहाकाली मंदिराच्या विकासासाठी २५० कोटींचा आराखडा तयार झाला. यात विविध कामांचा समावेश आहे. आमदार किशोर जोरगेवार हे याबाबत पाठपुरावा करताना दिसतात. पण, अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्नच आहे.

काय आहेत अटी व शर्ती६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका तीर्थ स्थळाला भेट देता येईल. प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे. यामध्ये भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे. लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर भाविकांत मोठी उत्सुकता होती. संनियंत्रणासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य समिती गठित झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड पूर्ण करेल. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर