शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

लाल्या रोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच गावातील धानाची शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देतोंडाशी आलेला घास हिरावला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे आर्थिक दुष्टचक्रात अडकलेले लहान-मोठे व्यावसायिक बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुरूवातीपासूनच पुरेसा पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन चांगले येईल, या आशेवर शेतकरी होते.

सद्यस्थितीत हलका व मध्यम धान कापणीसाठी आला आहे. मात्र जड वाणाचे धान कापण्याला २० ते २० दिवसांचा कलावधी आहे. कापणीसाठी आलेल्या धानावर लाल्या, मावा व तुडतुडा रोगाने आक्रमण केले. परिणामी, या रोगाचे बाधित क्षेत्र शेकडो हेक्टर झाल्याचे दिसून येत आहे. धानावर रोग येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधी फवारणी केली. परंतु, काहीही बदल झाला नाही. त्यामुळे तोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जाण्याची भीती वर्तवली जात आहे. असे घडल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना यंदाही कर्जातच जगावे लागणार आहे. शासनाने तालुक्यातील धान पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याची मागणी बंडू तराळे, अशोक श्रीरामे, कवडू दडमल, वैभव गायकवाड आदी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहेकृषी विभागाचे दुर्लक्षबंदर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी केली. मात्र याला न जुमानता मावा तुडतुडा रोगाने पुन्हा शेकडो हेक्टर क्षेत्र बाधीत केले. कीड रोगाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. मात्र कुणीही बांधावर येऊन मार्गदर्शन केले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कीडरोग नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. पण उपयोग झाला नाही. अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. याकडे कदापि दुर्लक्ष करू नये, अशा सूचना दिल्या. यंदा ब?्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून धानाची शेती केली. पीक हाती आले नाही तर जगायचे कसे हा प्रश्न सतावणार आहे.-अजहर शेख, सदस्य पंचायत समिती सदस्य, खडसंगी

टॅग्स :agricultureशेती