शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पर्यावरण संवर्धनासाठी मनपाने उभारले विसर्जनकुंड

By admin | Published: September 20, 2015 1:36 AM

पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत.

निर्माल्य कलशही आणले : यंदा प्रथमच उपक्रमचंद्रपूर : पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत. या सोबतच निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशही ठराविक चौकात ठेवले आहेत.चंद्रपुरातील बिघडलेले पर्यावरण, उद्योगांमुळे दूषित होणारे नदी आणि तलावांचे पाणी यावर चिंता व्यक्त करीत चंद्रपुरातील पर्यावरणवादी संघटनांनी मागील वर्षीच यावर उपायोजना करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मागील वर्षी इरई नदीपात्रलगत कृत्रित तलावासारखा मोठा खड्डा करून विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था मनपाने केली होती. या सोबतन त्या ठिकाणी निर्माल्य कुंडही ठेवले होते. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसादही दिला होता. एकट्या चंद्रपूर शहरात साधारणपणे २० हजार कुटूंबांकडे घरगुती गणेशमूर्तींची स्थापना केली जाते, या सोबतच ५०० वर सार्वजनिक मंडळातही गणेशमूर्तींची स्थापना होते. असा निष्कर्ष आहे. चंद्रपुरात सार्वजनिक गणेश मंडळातील मोठ्या मूर्र्तींचे विसर्जन रामाळा तलावात तर, लहान मूर्र्तींचे विसर्जन इरई नदीत केले जाते. यामुळे तलावात आणि नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रदुषण होते, गाळ साचला जातो, हा दरवर्षीचा अनुभव आहे. हे लक्षात घेवून यंदा महानगर पालिकेने पुढाकार घेवून शहरात फायबर प्लॉस्टीकने तयार केलेले विसर्जन कुंड आणले असून ते शहरात पाच ठिकाणी ठेवले आहेत. एका कुंडात सात ते आठ हजार पाणी राहणार असून किमान दोन हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची क्षमता या कुंडात आहे. मूर्र्तींचे विसर्जन तलावाच्या पाण्यात झाल्यावर मूर्तीवरील रासायनिक रंग पाण्यात मिसळतात. यामुळे जलप्रदुषण वाढते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती असल्यास त्या विरघळत नसल्याने पाण्यावर तरंगतात. त्यामुळे मूर्तींचे पावित्र्य नष्ट होते. हे टाळण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)