शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दारू विके्रत्यांना मिळणार नाही ग्रामपंचायत योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:52 PM

गावात दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव येरगाव ग्रामसभेने पारीत केला. दारूबंदीसाठी असा प्रेरणादायी निर्णय घेणारी निर्णय जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ठळक मुद्देग्रामसभेत ठराव पारित : येरगाववासीयांचा प्रेरणादायी पुढाकार

शशीकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : गावात दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव येरगाव ग्रामसभेने पारीत केला. दारूबंदीसाठी असा प्रेरणादायी निर्णय घेणारी निर्णय जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.दारूबंदी असतानाही गावात दारू विक्री सुरू असल्यामुळे युवापिढी व्यसनांच्या आहारी गेली होती. अनेक कुटुंंबांमध्ये वाद निर्माण झाले. महिला त्रस्त झाल्या. दारूबंदीसाठी यापूर्वी काही नागरिकांनी प्रयत्न केले होते. परंतु आळा बसला नाही. अखेर युवक व महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांपर्यंत हा विषय नेला. सरपंच महादेव नागापुरे, उपसरपंच नलिनी नागापुरे, ग्रामपंचायत सदस्य रूमदेव गोहणे, प्रतिभा नागापुरे, गणेश तोडासे, शारदा रायपुरे, प्रियंका गेडाम, माया कुळमेथे, कापूरदास गेडाम, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद नागपुरे, माजी सरपंच संजय पुलझेले, पोलीस चावरे, ग्रामसेवक एम. पी. दडांजे, पोलीस पाटील चंदू चावरे आदींनी या विषयावर चर्चा करून ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ही ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. दारूबंदी असल्यामुळे गावात कुणी दारूविक्री केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. परंतु गावकºयांनी निर्णय घेतल्यास ग्रामपंचायतकडून सर्वदृष्टीने मदत केली जाईल, अशी भूमिका सरपंच गोहणे यांनी मांडली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. याची अमंलबजावणी येरगावात झालीच पाहिजे, यासाठी ग्रामसभेने चर्चा करण्याची विनंती सभेत करण्यात आली. या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. गावात दारूविक्री करणाºया व्यक्तीला ग्रामपंचायतच्या विकास योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. दारू विक्रेत्यांना रहिवासी दाखले, उत्पन्न व अन्य कोणतेही प्रमाणपत्र ग्रामपंचायतने देऊ नये, दारूविक्री करताना पोलिसांनी अटक केल्यास गावातील व्यक्तीने जमानत घेतल्यास त्यांनाही ग्रामपंचायतच्या योजना किंवा दाखले देण्यास मनाई करण्याचा ठराव ग्रामसभेने पारीत केला आहे.कोंबडा बाजार, जुगाऱ्यांनाही शिक्षायेरगाव येथे कोंबडा बाजार व जुगार खेळल्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. कारवाई करण्यासाठी ग्रामसभेने पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांची समिती तयार करण्यात आली. गावातील अवैध व्यवसायांना आळा बसावा, यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते. मात्र उपयोग झाला नव्हता. ग्रामसभेने ठराव घेऊन ग्रामपंचायतच्या योजनांचा लाभ देण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे येरगावचा हा ठराव मूल तालु्क्यात चर्चेचा विषय ठरला आहे.