शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:47 PM

तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देपशुपालक शेतकरी हैराण : चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये चराईसाठी काही वर्षांपूर्वी शासनाने राखीव जमीन ठेवली होती. पण राजकीय नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले. शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण नसताना बोगस पट्टे तयार करून बांबू व इतर झाडांची कत्तल केली. त्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे धानशेतीच्या बांध्या तयार केल्या. चराईचे क्षेत्र नष्ट केल्याने शेतकºयांना जनावरे चराईसाठी कुठे न्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी अन्य पाळीव प्राणी पालन करतात.यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती परंतु या जनावरांना चारण्याकरिता आता जागाच शिल्लक नाही. चराईचे क्षेत्र नष्ट करून त्यावर शेती केली जात आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे धानपिकाचे पुरेसे उत्पादन होत नाही. जनावरांना चाऱ्यासाठी मिळणारी तणससुद्धा मिळणे दुरापास्त झाले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जनावरांची विक्री केल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक विचार केल्यास आजमितीस अनेक ेगावांतील जनावरांमध्ये मोठी घट झाली.