शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Published: September 18, 2015 1:02 AM

यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली.

शेतकरी संकटात : आर्थिक विंंवचना धोक्याचीगुंजेवाही : यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी लागवड सुद्धा केली नाही. मात्र पाण्याअभावी आशेचा पूर्ण आधार न सापडल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. यापूर्वी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या आज ना उद्या पाऊस येईल व तलाव भरेल या आशेने पिकाची लागवड केली. त्या शेतकऱ्यांचे शेतातील पीके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पून्हा विविध रोगांची भर पडली आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी सुद्धा शेतीवर औषधी फवारीत आहे. परंतु महागडे औषधी फवारुनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे तर धानाचे भाव कमी असल्याने उरल्या सुरल्या आशा मावडत आहेत.कमी भावामुळे लागवड खर्चही भरून निघत नाही. व्यापारी शेतकऱ्यांची थट्टा चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवर जो तो लाथा मारीत सुटलेला आहे. शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. शेतातील मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्याव, ठोकळ धानाचा भाव कमीत कमी १७०० रुपये व बारीक धानाचा भाव कमीत कमी २७०० रुपये या भावाने विक्री व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. किटकनाशके व खते यांची किंमत कमी करुन शेतकऱ्यांपर्यंत पुरविण्यात मदत करावी, तरच शेतकरी सुखी होईल नाही, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)