शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

ऐंशी टक्के पीक मातीत गेलं; कागदावर लिहिलं २९ टक्के

By साईनाथ कुचनकार | Published: February 22, 2024 4:33 PM

अन्नदाता एकता मंच, पीक विम्याची रक्कम आता तरी द्या हो.

साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अशात ८० टक्के नुकसान झाले असतानाही कागदोपत्री केवळ २९.५६ टक्केच दाखविल्याचा आरोप करत अन्नदाता एकता मंचने पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात अन्नदाता एकता मंचने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ८० टक्के नुकसान झालेले असताना सुद्धा विमा कंपनीकडून २९.५६ टक्के दाखवण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन तथा उपोषण करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, विनोद ठोंबरे, सुनील मोरे, अमोल क्षीरसागर, सुनीता दर्वे, कविता कुटेमाटे, रत्नमाला आस्कर, वंदना आसुटकर, भास्कर कुटेमाटे, योगेश मत्ते, अक्षय कुटेमाटे, योगेश कुटेमाटे, भोजराज डाखरे, हेमंत बोबडे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

घेराव घातल्यानंतर मिळाली होती रक्कम :

सन २०२२ मध्ये विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ केली होती. नुकसानीचे प्रमाण अधिक असतानाही कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. यासंदर्भात पिपरी देशमुख येथील शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला होतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याची आठवणही शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना करून दिली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmerशेतकरी