शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

एफडीसीएमच्या जंगलात भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 11:13 PM

वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे.

ठळक मुद्देकन्हारगाव-झरण क्षेत्रातील जंगलाची राख : बांबू, फाटे, इमारती लाकडे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग विझविण्यासाठी वनविकास महामंडळाकडे अद्यावत यंत्रणा नाही. काही ठिकाणी आग विझविण्यासाठी आग प्रतिबंधक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी आग नियंत्रणासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. ६७ मध्ये लागलेल्या आगीत बांबू, बांबू बंडल, बिट, फाटे व इमारती लाकूड जळाले. कन्हारगाव, झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र. ५, १७, १३, १०८, १४, ७६, १२४, १२३, ८२, ८१, ६, १३२, ६८, ७२, ७३, १९, १८, १७, १६, १, २, ३ व ६७ मध्ये मोठ्या प्रमाणात वनवा भडकला. यात बांबू, बिट, फाटे, बांबू बंडल, इमारती लाकूड जळाले आहे. मागील वर्षी निष्कासित करण्यात आलेला लांब बांबू व बांबू बंडल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक झाला नाही. तो पूर्णत: जळाला आहे.बल्लारशाह विभागाअंतर्गत झरण कन्हारगाव, तोहोगाव व धाबा वनक्षेत्र असून त्याअंतर्गत ३२ हजार हेक्टरवर मौल्यवान जंगल आहे. या जंगलात दरवर्षी विविध निष्कासनाची कामे केली जातात. त्यातील वनउपजाची वाहतूक विक्री डेपोवर होत नसल्याने वनउपज जळून खाक झाले आहे.कक्ष जळाल्यानंतर त्याचा पीओआर करावा लागतो. मात्र वनरक्षक प्रत्यक्ष जळालेले क्षेत्र न दाखविता, अल्प क्षेत्र दाखवून स्वत:ला संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी जळालेल्या क्षेत्राचे पीओआर केले नसल्याची माहिती आहे. तर काहींनी त्याची सत्य माहिती कारवाईच्या भितीने वनविभागाला दिली नाही. यावर्षी वनव्यात भरपूर जंगल, वनउपज जळला असून त्याची चौकशी होणे आवश्यक असून जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नुकसानजंगलात आग पसरू नये, यासाठी जाळरेषा व पालापाचोळा दहा मिटर अंतरावर जाळण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अधिकारी कामचलावू धोरण अवलंबून दर्शनी भागात कामे करतात व आतील कामे करीत नाही. परिणामी वनवा जंगलभर पसरतो. यात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व खाबुगीरीने जंगलाचे नुकसान होत आहे. आगी लागल्यानंतर ही माहिती जबाबदार वनरक्षक, वनपालांनी आग यंत्रणेला द्यावी लागते. मात्र ती माहिती दडविली जात आहे.