शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; तक्रारीत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:18 AM

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्ट्रागाम आदी सोशल साइटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना नवनवीन मित्र बनविण्याचे जनू फॅडच जडले ...

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्ट्रागाम आदी सोशल साइटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना नवनवीन मित्र बनविण्याचे जनू फॅडच जडले आहे. मात्र यातून अनेकांची फसवणूक होत आहे. कोरोना काळात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला होता. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांना पैशांची चणचण भासत होती. त्यात एकमेकांना भेटता येत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद सुरू होता. त्याचा हॅकर्सनी फायदा उचलला. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून संवाद साधला. मैत्री केली. त्यानंतर खात्यावर पैसे पाठविण्यास सांगायचे. अशा प्रकारे ही फसवणूक करण्यात येत होती. जिल्ह्यात असे अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट आल्यास तपासूनच स्वीकारावी तसेच फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

बॉक्स

तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यात बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा तक्रारीमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे बहुतेक जण तक्रार करण्यासही मागे-पुढे पाहतात.

फेसबुक अकाऊंट वापणाऱ्यांनी त्याच्या पोस्ट केवळ मित्रांनाच दिसतील अशा पद्धतीची सेटिंग करावी. सेटिंगमधील ऑल या ऑप्शनऐवजी ओन्ली फ्रेंड हे ऑप्शन सिलेक्ट करावे.

फेसबुकचा वापर करीत असताना एखाद्या मित्राकडून पैशाची मागणी होत असेल तर मोबाईलवरून खात्री करून त्यानंतरच मदत करावी.

फेसबुक अकाऊंट बनावट आहे, असा संशय आल्यानंतर या संदर्भात थेट स्थानिक पोलीस किंवा सायबर शाखेकडे रितसर तक्रार दाखल करावी.

बॉक्स

तक्रारीनंतर सायबर पोलीस घेतात शोध

सोशल मीडियावर अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलच्या माध्यमातून ई-मेल आयडी व इतर माहिती घेऊन संबंधित व्यक्तीचा पासवर्ड परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानंतर तो पासवर्ड फॉरमेट करण्यात येतो.

फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर पोलीस त्यांचा छडा लावत असतात. त्यासाठी सायबरमधील तज्ज्ञ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असते.

बॉक्स

फेसबुकला पाठविला जातो मेल

फेसबुक अकाऊंटवर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल करावी लागते. पोलीस प्रशासनातील सायबर सेलकडे ही तक्रार आल्यास सेलच्या माध्यमातून त्या आयडीचा स्क्रिन शॉट काढून फेसबुकला रितसर ई-मेल व अर्ज पाठवून फेसबुक अकाऊंट बंद केले जाते. तक्रार केल्यानंतर काही दिवसात तो अकाऊंट बंद करण्यात येते.

बॉक्स

कोरोना काळात वाढल्या तक्रारी

दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्व बंद असल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. ही बाब हेरून अनेकांनी फेक अकाऊंट बनवून लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून मदत मागितली. अनेकांनी कुठलीही तपासणी न करता मदत केली. नंतर त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तर बहुतेकांशी सोशल मीडियावर बनविलेल्या फ्रेंडने व्हिडिओ कॉल करून संबंधितास अश्लील छायाचित्रे दाखवत संबंधिताची फसवणूक केल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.