शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

शेतकऱ्यांनो ३० जून पर्यंत 'केवायसी' करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 4:25 PM

Chandrapur : वर्ष लोटूनही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित; 'केवायसी' अभावी २०३२ शेतकऱ्यांची आर्थिक मदत थांबली

बी. यू. बोर्डेवारलोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : मागील वर्षी जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. शासनातर्फे दिले जाणारी आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांचे बँक खात्याची 'केवायसी' झाली नसल्यामुळे जमा झालेले नाही. यात राजुरा तालुक्यातील केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजार ३२ एवढी आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आलेले लाखो रुपये 'केवायसी' अभावी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.

मागील खरीप हंगामामध्ये जुलै ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे नदी व नाल्याकिनारी असणाऱ्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्यामुळे उभी पिके नष्ट झालेली होती.

यात नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याबाबत महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केलेले होते. तालुक्यात पाच हजार ७६५ लाभार्थ्यांना शासनातर्फे आर्थिक लाभ मिळणार होता. गाळ साचून, जमीन खरवडून व अतिपावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. यामध्ये आतापर्यंत दोन हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे, तर एक हजार ४७८ शेतकऱ्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही दिवसांत रक्कम जमा होणार आहे; मात्र अजूनही तब्बल दोन हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम ही शासनाकडे अजूनही जमा आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम शासनाला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. 

तांत्रिक अडचणीच्या नावावर तब्बल वर्षभरानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी हतबल आहेत. जेमतेम आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

संमतीपत्र नसलेल्यांनाही मदत नाहीयाशिवाय सामायिक खातेदारांचे संमतीपत्र नसल्यामुळेही शासनाकडून मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची माहिती आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी झालेली आहे, तर दुसरीकडे मागील वर्षीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानभरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा आर्थिक संकटात बळीराजा सापडल्या असल्याने आता 'केवायसी'चे नवीन संकट त्यांच्यासमोर उभे आहे.

तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी जुलै, ऑगस्ट २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वाटप प्रक्रिया शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन डीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २२५५ शेतकरी बांधवांना अनुदान रक्कम प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा झाली असून १४७८ शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झाली असून लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा होईल.- डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर