शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ‘फायर फायटिंग’

By admin | Published: September 26, 2015 12:56 AM

राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता : चतुर्थ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भारचंद्रपूर : राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे. मनपा अग्निशमन विभागाचा डोलारा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे हे अप्रशिक्षित कर्मचारी फायर फायटिंगसाठी दोन हात कसे करणार, असा प्रश्न मनपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नावर महापौरांसह आयुक्त अनुत्तरीत झाल्याने फायर फायटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात अनेक ठिकाणी अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत. गल्लीबोळात डॉक्टरांनी दवाखाने थाटून व्यवसाय सुरु केला आहे. आजही अनेक डॉक्टरांनी पालिकेकडे साधी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे अवैध इमारतींवर बुलडोझर चालवून नंतर फायर आॅडीटची अंमलबजावणी केल्यास ती यशस्वी होईल, असे नगरसेविका सुनिता लोढिया यांनी म्हटले आहे. तर आता जे चतुर्थश्रेणी कर्मचारी अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही, सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आधी सोयी सुविधा पुरवाव्या. सोबतच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करुन नंतरच फायर फायटिंग राबवावी, अशी मागणी बलराम डोडाणी यांनी केली. फायर फायटिंगचे काम एका एजन्सीमार्फत केले जात आहे. इमारत बांधकामाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि अन्य कागदपत्रे सादर केलेल्यांना फायर फायटिंग प्रमाणपत्र दिले जाते. आतापर्यंत शहरातील ७६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील ३५ लोकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. केवळ अंतर्गत व्यवस्था म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतली जात आहेत. येथे कुणीही प्रशिक्षीत कर्मचारी नाही. मात्र, त्यांना सुरक्षा साधने पुरविली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी बेग यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)