शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 2:13 PM

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्षगावकऱ्यांना विविध आजाराची लागण

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.फ्लोराईडयुक्त गावांचे सन २०१४-१५ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावे आढळून आली. या गावातील स्रोत्रातून येणारे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. एवढेच नाही तर विविध आजारांना आमंत्रण देणारे आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने दात पिवळे पडणे, सांधेदुखीचा त्रास होणे, हातपाय नेहमी दुखणे अशाप्रकारचे अनेक आजार होतात.या गावांना निदान पिण्यासाठी तरी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे. मात्र असे असले तरी ४६ गावे अद्यापही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २८ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य-२ अंतर्गत योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे आणि १८ गावात योजना प्रस्तावित केल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे. मात्र या गावांना प्रत्यक्षात शुद्ध पाणी केव्हा मिळेल, याबाबत कोणीही सांगू शकत नाही.नवानगरचा संघर्षनागभीड तालुक्यातील नवानगर हे गावही फ्लोराईडयुक्त आहे. सतत फ्लोराईडयुक्त पाणी पित असल्याने नवानगरचे नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. आम्हाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांचा २००५ पासून संघर्ष सुरू असला तरी त्यांना अद्यापही शुद्ध पाणी मिळाले नाही. परिणामी त्यांना फ्लोराईडयुक्तच पाणी प्यावे लागत आहे. येथील नागरिकांनी आतापर्यंत सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवले. पण गेल्या १३ वर्षात त्यांची मागणी कुणीच पूर्ण करू शकले नाही.जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ३२६ गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता नळयोजना अस्तित्वात असल्याचे सांगत आहे. मात्र यात शंका असून नळयोजनांचा अनुभव लक्षात घेता त्या केवळ अस्तित्वातच असाव्यात. किती गावांना प्रत्यक्षात पाणी मिळत आहे, याची सविस्तर माहिती आपण पाणीपुरवठा विभागाला मागणार आहे.- संजय गजपूरेजि.प.सदस्य, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी