शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

By admin | Published: May 03, 2017 12:44 AM

जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

पोलीस आले मदतीला : लोलडोह व पाटागुड्याचा टंचाई आराखड्यात समावेश नाही

मिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अशा गावांचा टंचाई आराखड्यामध्ये केला समावेश नसल्याचे पुढे आले आहे. स्थानिक लोकांनी ओरड केल्यावर गटविकास अधिकाऱ्याने पाटागुडा व लोलडोह या गावांचा विशेष प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला. त्यातील पाटागुडामध्ये पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस विभागाने तत्परता दाखवून बोअरवेल खोदून दिली आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ४१३ गावांसाठी प्रस्तावित टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामध्ये जिवती तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह आहे. या गावांमधील पाण्याचे स्रोत आटले आहेत. आसपास कोठेही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गावापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचत नाही. या परिस्थितीमध्ये महिलांना पहाटेची झोप मोड करून तीन ते चार किलोमीटर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणी मिळाल्यानंतर ते घागरींमध्ये भरून डोक्यावर पायी चालत आणावे लागत आहे. ही दररोजची स्थिती असली तरी त्याकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे फारसे लक्ष नाही. त्यामुळेच टंचाई आरखडा तयार करताना अनेक गावांचा समावेश करण्यात आलेला नाही.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टंचाई आराखड्यात जिवती तालुक्यातील पाटागुडाचा (मांगगुडा) समावेश नव्हता. जिवती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेकडे पाटागुडाचा विशेष प्रस्ताव पाठविल्यानंतर टंचाई उपायोजना हाती घेण्यात आली आहे. तेथे भीषण पाणीटंचाई आहे. ही बाब पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाला आढळून आली. पाटागुडाप्रमाणे लोलडोहचाही टंचाई आराखड्यात समावेश नव्हता. त्यामुळे पाणीटंचाई नियंत्रणात आणण्याकरिता जिवतीच्या गटविकास अधिकाऱ्याने २९ एप्रिल रोजी लोलडोहचा प्रस्ताव पाठविला. या दोन्ही गावांसाठी खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पाटागुडाला मिळाली बोअरवेलनक्षलग्रस्त भाग असल्याने पोलिसांनी २६ एप्रिल रोजी जिवती तालुक्यात पेट्रोलिंग केली. त्यावेळी पाटणपासून १५ किलोमीटर अंतरावरील पाटागुहा येथे रणरणत्या उन्हात महिला डोक्यावर पाणी भरलेल्या घागरी आणत असल्याचे आढळून आले. हे गाव भाईपठारपासून दीड किलोमीटर आत जंगलामध्ये असून तेथे केवळ २० घरांची लोकवस्ती आहे. तेथे पोलिसांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या अभियानातील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी यांनी गावातील पाणी समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्यापुढे मांडली. दिवान यांनी लगेच तेथे बोअरवेल करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व पीएसआय मडावी यांनी दोन दिवसांत गावात बोअरवेल खोदून दिली.