शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

वनक्षेत्रातील कृषी पंपांना यापुढे 12 तास अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:36 PM

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत नागरिकांचे बळी जात असल्याने शेतकरी रात्री  शेतात जाण्यास धास्तावला. ही समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात दिवसा होणारे कृषी पंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायंकाळी  ६ वाजेपर्यंत कृषी पंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर  व गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना दिवसा कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ मान्यही केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्पादनाचे नुकसान टळणारकृषिपंपांना वीजपुरवठा मुबलक नसल्याने विहिरीतील पाणी शेतीला देता येत नाही. या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत, पण त्यावर उपाययोजना झाली नव्हती. जिल्ह्यातील शेतीला ऊर्जास्रोत कमी पडत आहे. ऊर्जेअभावी शेतीस पाणी न मिळाल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतो आणि त्याचा फटका उत्पादनाला बसतो. अशा एक ना अनेक समस्यांनी शेती ग्रासली आहे.

 वनक्षेत्रात सर्वाधिक अडचणीवनक्षेत्रातील शेतकरी आता पारंपरिक भातशेतीसोबत विविध प्रकारची नगदी पिके घेण्यास उत्सुक झाले; परंतु कृषिपंप असूनही विजेअभावी त्यांचा निरुपयोग झाला. नगदी पिकांचा अभाव आणि पारंपरिक शेतीमुळे अल्प उत्पादन या दुष्टचक्रात जिल्ह्यातील शेती अडकली आहे. विजेच्या सतत टंचाईने शेतीची कामे अर्धवट ठेवावी लागतात.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती