शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:31 AM

रत्नाकर चटप नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई घालवण्यासाठी सन १९९८ मध्ये ५६ कोटी रुपये खर्च करून प्रादेशिक पाणीपुरवठा ...

रत्नाकर चटप

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई घालवण्यासाठी सन १९९८ मध्ये ५६ कोटी रुपये खर्च करून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अमलात आली. सुरुवातीला आठ ते दहा वर्षे योजना सुरळीत चालल्यानंतर काही ठिकाणी पाईपलाईन फुटली तर कुठे गावातील विद्युत बिले न भरल्यामुळे योजना मोडकळीस आल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे.

या योजनेंतर्गत कोरपना तालुक्यातील निमणी, सोनुर्ली, कोठोडा, कोडशी आदी ठिकाणी पाणीपुरवठा केंद्र तयार करण्यात आले आणि जवळपास ७० ते ८० गावांना नळयोजना जोडण्यात आली. परंतु योजना कार्यान्वित झाल्यानंतर नळ योजनेची दुरुस्ती न केल्यामुळे आज तालुक्यातील ३० ते ३२ गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न पुढे येत आहे. निमनी केंद्रातून या योजनेंतर्गत केवळ चार गावांना पाणी पुरवठा होतो तर उर्वरित १४ गावातील नळयोजना बंद आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पकडीगुड्डम धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोनुर्ली पाणीपुरवठा केंद्रातून पिपर्डा वगळता अन्य गावांना पाणी पोहचत नाही.

कोरपना तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व इतर योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेतला असून योजनेला गती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉक्स

कोरपना शहरातील पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपना शहरासाठी सन २०१५ मध्ये तीन कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये देण्यात आले. मात्र अजूनही कोरपना शहरात पाणीपुरवठा योजना सुरू झालेली नाही. योजनेच्या मंजुरीला सहा वर्ष उलटले. परंतु बांधकामाला गती आल्याचे दिसत नाही. यातच गावातील काही विहिरी पाणीपुरवठा योजना सुरू होईल या उद्देशाने बुजवण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना बोअरवेल शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हीच परिस्थिती गडचांदूर शहरातही दिसते. १२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र चार ते पाच वर्षे उलटूनही योजना अद्याप सुरू झालेली नाही. गडचांदूरमध्ये काही वॉर्डांमध्ये उन्हाळ्यात मोठी पाणीटंचाई दिसून येते.

बॉक्स

काही ग्रामपंचायतीचा नळ योजनेसाठी पुढाकार

कोरपना तालुक्यात काही ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून स्वतः पाणीपुरवठ्यासाठी पुढाकार घेतलेला असून नळ योजनेची काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गावातच नागरिकांना पाण्याची उत्तम व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे.