शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

वसतिगृहात प्रवेशासाठी मुलींचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 12:52 AM

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत.

जागा भरल्या : विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचितचंद्रपूर: आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत. मात्र, त्या कागदावरच असतात, याची प्रचिती शनिवारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बघावयास मिळाली. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पालकांसह सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातला. आदिवासी समाजातील मुलींसाठी चंद्रपुरात दोन वसतिगृहे आहेत. यातील एका वसतिगृहाची ७५, तर दुसऱ्या वसतिगृहाची १२५, अशी क्षमता आहे. त्यासाठी आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जातो. उच्चशिक्षणासाठी चंद्रपुरात येणाऱ्या या समाजातील मुलींना याच वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली. यावर्षी जून महिन्यात ती पार पडली. यामध्ये अनेक मुलींनी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबर महिना लोटल्यानंतरही प्रवेशप्राप्त आणि प्रवेश नाकारलेल्या मुलींची यादी जाहीर करण्यात आली नाही. याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षकाला विचारणा केली असता त्यांनी सर्व जागा भरल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलींनी पालकासह सहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. मात्र, सर्व जागा भरल्या आहेत, असे सांगत त्यांनी या मुलींना पिटाळून लावले. त्यानंतर मुलींनी आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षांना ही हकिकत सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. वसतिगृहाची क्षमता कमी आहे. १२५ विद्यार्थ्यांची येथे क्षमता आहे. मात्र त्यात केवळ शंभरी मुलीच राहू शकतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. निवड झालेल्या मुलींची सूची लावणे आवश्यक होती. ती जबाबदारी वसतिगृहाच्या अधीक्षकांची होती, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाहणे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)