शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 10:36 PM

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देअतोनात नुकसान : हजारो हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात प्रामुख्याने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान पीक गर्भाशयात असताना पाण्याची नितांत आवश्यकता असते. प्रशासनामार्फत गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यांतर्गत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व गर्भाशयात असलेले धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा आशेत बळीराजा होता. गोसेखुर्दच्या कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कंत्राटदाराने उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टरवरील धान पीक क्षणार्धात पाण्याखाली आले. त्यामुळे तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदीड, मूग, लाखोळी व तुरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाºया खडतकर कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुरुमामुळे शेताची प्रत खराबगोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुरूम गेले असून शेतजमीन निरोपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच छोट्या कालव्यामध्ये मुरूम गेल्यामुळे छोटा कालवा पूर्णत: दिसेनासा झाला आहे.तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेटसदर उजव्या कालव्याची पाळ फुटल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून पंचनामा करण्याचा तलाठ्यांना आदेश दिला. त्यानंतर तलाठी मून, आकूलवार व कोतवाल अमित मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महेश पिलारे, विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, सुनील राऊत आदी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.यापूर्वीही पाळीवर पडले होते भगदाडयापूर्वीसुद्धा याच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवर मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शेतकºयांची पिके करपण्याच्या मार्गावर होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.