शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

वृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालयाची उदासिनता

By admin | Published: May 23, 2016 12:55 AM

विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते.

पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची गरज : लाखो झाडे लावल्याची नोंद कागदावरचब्रह्मपुरी : विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते. त्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु झाडे लावल्याची नोंद कागदावरच होत असल्याने जुन्या खड्डयात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र चांगलेच वाक्बगार झाले असल्याचे दिसून येत आहे.पावसाळा सुरू होण्याला १० ते १५ दिवसांचा कालावधी असताना वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहूर्त सापडला नाही. शासनाच्यावतीने विविध कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्यामुळे वृक्ष वाढण्याच्या ऐवजी नष्ट होत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीवर होणारा कोट्यवधींचा खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने वृक्ष लागवडीऐवजी वृक्ष संगोपनावर व संरक्षणाला अधिक महत्त्व देवून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. शासनाने मागील वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करून वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पालिका, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, लघु सिंचन विभाग, कृषी विभाग व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवड कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. परंतु यावर्षी या कार्यालयांकडून अद्याप वृक्ष लागवडीसाठी हालचाल दिसून येत नसल्याने उदासिनता स्पष्ट झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)