शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी व गरिबीसाठी शासनच जबाबदार

By admin | Published: October 03, 2015 1:00 AM

इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि ...

विलास गरूड : जिल्हा संघटन समिक्षा बैठकीत प्रतिपादनचंद्रपूर : इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबविणारे असल्यामुळेच देशात, गरिबी, बेरोजगार अंधश्रद्धा वाढून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. या देशाची व्यवस्था विषमता पोसणारी व भांडवलदार धर्जिणी असल्याचे मत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी व्यक्त केले.स्थानिक बॅरिस्टर खोब्रागडे सांस्कृतिक भवनात १ आॅक्टोबर रोजी बसपा चंद्रपूर जिल्हा संघटन समिक्षा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीमुळेच या देशातील दलित-आदिवासी-ओबीसी व अल्पसंख्यांक मुस्लीम या बहुजन समाजातील घटकांचा थोड्याफार प्रमाणात विकास होऊ शकला. परंतु विद्यमान सरकार या बहुजन समाजाला विकासापासून वंचित ठेवून पुन्हा गुलाम करण्यासाठी आरक्षण संपविण्याची भाषा करून आरएसएसचा छुपा अजेंडा अंमलात आणण्याचे षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहापासून कार व मोटारसायकल रॅलीने कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकात आले. तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विलास गरूड यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह माल्यार्पण केले व डॉ. आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पायदळ रॅली काढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमस्थळी फटाके फोडून आतीषबाजी करण्यात आली. त्यांचे गुलाबपुष्पांच्या हाराने स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बसपात प्रवेश घेतला. या जिल्हा संघटन समिक्षा बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष क्र्रिष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव नानाजी देवगडे, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, भिमेंद्र कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पूर्व विदर्भ झोन कॉर्डिनेटर सुशिल वासनिक यांनी तर आभार जिल्हा महासचिव सुधाकर तेलसे यांनी मानले. (प्रतिनिधी)