शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

ग्रामसेवक शहरात; गाव विकास भकास ! ग्रामसेवकांना मुख्यालयाची ॲलजी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:59 IST

मूल तालुक्यातील विदारक वास्तव : कसे होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यांच्यातील विकासात्मक दुवा समजाला जातो. मात्र, मूल पंचायत समितींतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमधील एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गाव विकासाला खीळ बसली आहे. बरेचशे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणावरून, तर काही ग्रामसेवक जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत आहेत. त्यामुळे गावाचा विकास कसा होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत. 

मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे. मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या सर्व योजना गावातील सर्व घटकांपर्यंत सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केलेल्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. मात्र, मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय सुद्धा घेतला आहे. मात्र, ग्रामसेवकाकडून शासन नियमांची पायमल्ली केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सभेलाही ग्रामसेवकांची दांडीमूल तालुक्यातील काही ग्रामसेवकांकडे अनेक ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थिती असते. बरेचदा ग्रामसभा व मासिक सभेला सुद्धा ग्रामसेवक दांडी मारतात. ग्रामसेवक गावात साधे फिरकूनही पाहत नसल्याने गावातील कोणता वार्ड कुठे आहे? याची साधी माहिती सुद्धा त्यांच्याकडे नसते. त्यांच्यामुळे गावातील सांडपाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था यासारख्या अनेक समस्यांवर योग्य उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरतात. त्यामुळे आजही अनेक गावात योग्य मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.

४९ ग्रामपंचायतीचा कारभारच ढेपाळलाग्रामपंचायत मूल तालुक्यात आहेत. त्यातुलनेत केवळ २९ ग्रामसेवक तालुक्यात कार्यरत आहेत. त्यातही ते मुख्यालयी राहत नाहीत.

"ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांचे कामे वेळेत होत नाही. अशातच एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. परिणामी, नागरिकांना एकाच कामासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे."- अनिल सोनुले, जिल्हा सहसचिव, अखिल भारतीय सरपंच परिषद.

"ग्रामसेवक नियमित येत नसल्याने कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये पायपीट करावी लागते. शासनाने ग्रामसेवकांना गावातच मुख्यालय राहणे बंधनकारक करावे, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत होतील."- सूरज हजारे, नागरिक

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrapur-acचंद्रपूर