शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

...अन् पालकमंत्र्यांनी बघितला चक्क काळा कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यातील उद्योगांकडून होणाऱ्या जीवघेण्या प्रदूषणाने अस्वस्थ आहेत. अखेर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चार दिवसांपासून मुक्कामी असलेल्या पालकमंत्र्यांनी शुक्रवारी यंत्रणेच्या ध्यानीमनी नसताना आपला ताफा थेट ताडाळी एमआयडीसीकडे वळविला. येरूर शिवारातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केला असता शेतात काळा कापूस दिसला. त्यावरील धूळ निरखून बघितली आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन प्रदूषण ओकणाऱ्या  कंपन्यांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले.  त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी नीलेश तायवाडे, वेस्टर्न कोल फिल्डचे गुप्ता यांच्यासह चमन मेटॅलिक, ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी स्टील, विमला इन्फ्रास्टक्चर आदी उपस्थित होते.

या कापसाला कोण भाव देणार?- काळा पडलेल्या कापसाला बाजारभावाच्या ५० टक्केसुद्धा भाव मिळत नाही. एकतर या कंपन्यांनी स्थानिकांना अत्यल्प रोजगार दिला आणि  नागरिकांच्या शेती व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सोबतच नागरिकांना डोळ्यांचे आजार, कॅन्सर, दमा, हृदयरोग यासारखे रोग दिले आहेत. जनावरेसुद्धा आजारी पडत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी नमूद केले.

गावकरी भरभरून बोलले, उ‌द्योगांची केली पोलखोलपालकमंत्र्यांनी शेतकरी प्रदीप जोगी आणि गुणवंत चंदनखेडे यांच्या शेतातील कापूस अक्षरश: काळा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी गावकऱ्यांनी मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. काळ्या पडलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्यावर कंपन्या पाणी मारत नाही. प्रदूषणाचे धूलिकण नागरिकांच्या शरीरात जातात. अशा कंपन्यांविरोधात सक्त कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी प्रकाश देवतळे, रामू तिवारी, येरूरचे सरपंच मनोज आमटे, माजी पंचायत समिती सभापती विजय बलकी, नकोडाच्या ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे, विद्या डांगे, मधुकर बरडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारpollutionप्रदूषण