शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
5
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
6
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
7
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
8
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
9
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
10
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
11
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
12
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
13
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
14
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
15
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
16
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
17
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
18
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
19
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
20
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा

जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 3:24 PM

इरई धरणाचे पाणी वाढतच असल्याने दोन दरवाजे उघडले असून, प्रशासनाने चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देशेकडो हेक्टर पिके पाण्याखाली; रस्ते खचले, घरांच्या भिंती कोसळल्या

चंद्रपूर : जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सर्व नदी-नाल्यांना पूर आला. चार जलाशये १०० टक्के भरले तर इरई धरणही तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी दिवसभर झोडपल्याने कापूस, सोयाबीन, तूर, धान, भाजीपाला आदी पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. अनेक गावांतील रस्ते खचले.

इरई धरणाचे पाणी वाढतच असल्याने दोन दरवाजे उघडले असून, प्रशासनाने चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पिके कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कमलापूर, कोदेपूर घाटात झाडे कोसळली

जिवती तालुक्यातील परिसरातील नदी, नाले तुडुंब भरले आहेत. विद्यार्थ्यांना पावसात भिजतच शाळा गाठावी लागत आहे व शाळा सुटल्यावरही भिजतच घर गाठावे लागत आहे. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, तर सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. वणी-येल्लापूर मार्गावरील कमलापूर व जिवती-येल्लापूर मार्गातील कोदेपूरच्या घाटात झाडे कोसळ्ल्याने सकाळी येणारी बस घाटातूनच परत गेली. बापूराव दत्तराव गोरे (आनंदगुडा) भोक्सापूर, संजय राठोड, वामन राठोड, उत्तम चव्हाण, किसन नामदेव राठोड, विठ्ठल पवार, उत्तम राठोड सेवादासनगर, किर्लोस राजाराम गायकवाड, येल्लापूर यासह पिट्टीगुडा, नंदप्पा, लांबोरी, जिवती, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, माराईपाटण, रोडगुडा येथील कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. नदीपुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नयेे़, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे तालुका प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदारांनी केले आहे.

डोलारातील १४ कुटुंबांना शाळेत हलविले

भद्रावती : मुसळधार पावसामुळे डोलारा तलावातील पाण्याची पातळी ओलांडून प्रभागातील शिरल्याने १४ कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा घुटकाळा येथे स्थलांतरित करण्यात आले. तलावाचे पाणी घरात शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबत झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी महिनाभरापूर्वीच तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रभागात उपाययोजना करण्याबाबत मागणी केली होती. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घटनास्थळी आमदार प्रतिभा धानोरकर, तहसीलदार सोनवणे तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली.

मारोड्याला बेटाचे स्वरूप

मारोडा परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने सोमवारी मारोड्याला पुराचा तडाखा बसला. गावाला काही तास बेटाचे स्वरूप आले होते. रहदारी बंद झाली होती. उमा नदीचे पाणी पिकांत शिरले. याचा जोरदार फटका धानाच्या पऱ्यांना बसला. अति पावसाने धान्याच्या बांध्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसाने परिसराला झोडपले. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान. पूर उरताच महसूल अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरchandrapur-acचंद्रपूर