शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

महामार्गाची धूळ उभ्या पिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:46 PM

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्या लगतच्या शेतकऱ्यावर नवे संकट : चौपदरीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. चिमूर - वरोरा हा मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावर विविध समस्या उद्भवत आहेत. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.वरोरा-चिमूर मार्गाचे कंत्राट एस.आर.के.कंपनीकडे असून मागील तीन महिन्यांच्या काळापासून चिमूर परिसरातील मार्गाचे काम ठप्प आहे. सोबतच या मार्गावर पाणी मारण्याचे काम नियमित होत नसल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ही धूळ लगतच्या शेतातील उभ्या पिकांवर बसत असल्याने पिकांचा रंग हळूहळू काळवंडू लागला आहे. विविध संकटातून धडपड करीत वाचवलेले पीक नव्या संकटात अडकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी नव्या चिंतेत अडकला आहे. याकडे कंत्राट कंपनीचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ते पर्यायी मार्गावर पाणी मारण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत.यामुळे कंत्राटी कंपनीने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. या मार्गावर उदभवणाºया विविध समस्यांकडे आता तरी बांधकाम विभाग लक्ष देणार काय, असा प्रश्न शेतकरी,नागरिक करीत आहेत.निर्माणाधीन रस्त्याच्या कामावर नियमित पाणी मारत नसल्याने रस्त्यालगतचे पीक धुळीने काळवंडले आहेत. याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होवून उत्पादन कमी होणार आहे. तेव्हा रस्त्यालगतच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना संबधित कंपानीने भरपाई द्यावी.-प्रशांत कोल्हेशेतकरी वहानगाव (बोथली) तथा तालुका अध्यक्ष मनसे