शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

४३६ रुपयांत किती जणांना मिळाला दोन लाखांचा विमा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:59 PM

वारसाच्या खात्यात थेट मिळतो लाभ : दरवर्षी करावे लागते नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. जीवन ज्योती ४३६ तर सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. मृताच्या वारसाला दोन लाखांचा लाभ थेट त्याच्या बँक खात्यात जमा केला आतो. कुटुंबातील सदस्याने काढलेल्या विम्याचा लाभ वारसांना मिळाला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा काढल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. विमा कव्हरच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ दिला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले जात आहे.

काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयांत काढला जातो. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी वारसाला दोन लाख रुपयांचा लाभ होतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. विमाधारकाचा सर्पदंशाने अथवा अपघाती मृत्यू आल्यास शवविच्छेदन अहवाल, पोलिस दप्तरी नोंद आवश्यक आहे.

विमा योजनेचा लाभ घ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या आहेत. या योजनेतून थेट मृताच्या लाभार्थ्यांच्या वारसाला लाभ मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेद्वारे विमा उतरून संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहन अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

'जीवन ज्योती'चे खातेदार लाखांवरजिल्ह्यात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढणाऱ्या खातेदारांची संख्या लाखांवर आहे. त्यासाठी ४३६ रुपये भरावे लागतात.अद्यापही अनेकजण विम्याचा लाभ घेण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.

'सुरक्षा विमा'चे तीन लाख खातेदारप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे जिल्ह्यात तब्बल तीन लाखांवर खातेदार आहेत. केवळ २० रुपयांत विमा निघत असल्याने नागरिक हा विमा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.  

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर